शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाने २९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण १,४२८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ७२१ झाली आहे.

कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासात ४,०१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अँटिजन चाचणीमध्ये २२१ रुग्ण तर आरटीपीसीआर चाचणीत ३०४ रुग्ण आढळले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ३ रुग्ण, दापोलीत २९, खेडमध्ये ७३, गुहागरात २२, चिपळुणात ११८, संगमेश्वरमध्ये ६०, रत्नागिरीत १५२, लांजात २२, राजापुरात २२ रुग्ण आणि इतर खासगी रुग्णालयातील १० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २४ तासात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये रत्नागिरीतील ४ रुग्ण, लांजातील २ आणि खेड, चिपळूणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये मागील २१ रुग्ण असून, त्यामध्ये रत्नागिरीतील ॲपेक्स हॉस्पिटलमधील २ जण, महिला रुग्णालयातील ६, गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७ रुग्ण, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील १ आणि सुश्रुषा कोविड केअर सेंटरमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ३.४२ टक्के आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.६८ टक्के आहे.