शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

जिल्ह्यात कोरोनाने २९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण १,४२८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ७२१ झाली आहे.

कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासात ४,०१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अँटिजन चाचणीमध्ये २२१ रुग्ण तर आरटीपीसीआर चाचणीत ३०४ रुग्ण आढळले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ३ रुग्ण, दापोलीत २९, खेडमध्ये ७३, गुहागरात २२, चिपळुणात ११८, संगमेश्वरमध्ये ६०, रत्नागिरीत १५२, लांजात २२, राजापुरात २२ रुग्ण आणि इतर खासगी रुग्णालयातील १० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २४ तासात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये रत्नागिरीतील ४ रुग्ण, लांजातील २ आणि खेड, चिपळूणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये मागील २१ रुग्ण असून, त्यामध्ये रत्नागिरीतील ॲपेक्स हॉस्पिटलमधील २ जण, महिला रुग्णालयातील ६, गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७ रुग्ण, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील १ आणि सुश्रुषा कोविड केअर सेंटरमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ३.४२ टक्के आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.६८ टक्के आहे.