शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाने २९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण १,४२८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ७२१ झाली आहे.

कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासात ४,०१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अँटिजन चाचणीमध्ये २२१ रुग्ण तर आरटीपीसीआर चाचणीत ३०४ रुग्ण आढळले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ३ रुग्ण, दापोलीत २९, खेडमध्ये ७३, गुहागरात २२, चिपळुणात ११८, संगमेश्वरमध्ये ६०, रत्नागिरीत १५२, लांजात २२, राजापुरात २२ रुग्ण आणि इतर खासगी रुग्णालयातील १० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २४ तासात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये रत्नागिरीतील ४ रुग्ण, लांजातील २ आणि खेड, चिपळूणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये मागील २१ रुग्ण असून, त्यामध्ये रत्नागिरीतील ॲपेक्स हॉस्पिटलमधील २ जण, महिला रुग्णालयातील ६, गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७ रुग्ण, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील १ आणि सुश्रुषा कोविड केअर सेंटरमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ३.४२ टक्के आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.६८ टक्के आहे.