शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कोरोनाने मृत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवचाची रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे मृत एस. टी. कर्मचाऱ्यांंच्या वारसांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर करण्यात आले असले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे मृत एस. टी. कर्मचाऱ्यांंच्या वारसांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर करण्यात आले असले तरी एकूण २६१ मृतांपैकी १० ते १२ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रक्कम प्राप्त झाली आहे. तरी महामंडळाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाने सर्व मृत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवचाची ५० लाख रुपये रक्कम देण्यात यावी.

याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांना दिले आहे. त्याद्वारे एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी दि. १ जून २०१८ रोजी वेतनवाढीपोटी एकतर्फी ४८४९ कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, त्याचे वाटप संघटनेने दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे केलेले नाही, असे म्हटले आहे.

कामगार करारातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रा. प. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे मान्य केले आहे. मात्र, जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीची ३ महिन्यांची २ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी व जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची ९ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून ५ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने अदा केलेला आहे.

महामंडळाच्या प्रचलित धोरणानुसार सेवेत असताना कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. मात्र, सद्य:स्थितीत ती थांबविण्यात आली असून, ती त्वरित सुरू करून नोकरी देण्यात यावी. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अद्याप झालेली नाही. ती त्वरित करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.