शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कोरोनामुळे बदलले घराघरांतले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन करण्याकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर तेलकट, बेकरी उत्पादनासह, फास्टफूड टाळण्यात येत असून प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ आवर्जून सेवन करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे मुले घरी आहेत. ५० टक्के उपस्थितीमुळे नोकरदार पालकही बहुतांशवेळा घरी असतात. कोरोनाची भीती सर्रास सर्वांना वाटत असल्याने मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पार्सल सुविधा उपलब्ध होत असली तरी बाहेरून अन्न मागविणे आवर्जुन टाळण्यात येत आहे. त्यामुळेच घरातच पौष्टिक पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जात आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

तेलकट, तुपाचे, मैदायुक्त बेकरी उत्पादने टाळून भाजी-भाकरी, पोळी भाजी खाण्याचा विशेष आग्रह राहत आहे. पालेभाज्यांना तर सर्वाधिक मागणी होत आहे. भाकरीमध्ये नाचणीला विशेष पसंती होत आहे.

मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी, नाचणीचे सत्त्व, फळांचे आवर्जून सेवन केले जाते. फास्टफूड ऐवजी नाष्ट्याला मुलांना मिश्र डाळींचे धिरडे, चटणी, अप्पे, मधल्या वेळेसाठी पौष्टिक लाडू देण्यात येत आहेत.

लिंबूवर्णीय फळांबरोबर खजूर, सुका मेवा, शेंगदाणा, गुळाचे सेवन करण्यात येते. पावसाळ्यातील गारव्यामुळे मेथी, डिंक, खारीक वापरून लाडू, वड्या तयार करण्यात येतात. एकूणच परिपूर्ण आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळविण्यावर अधिक भर आहे. यामुळे मुलांचे अन्य खाणे कमी झाले आहे.

वेळेवर जेवणाची सवय

लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित असल्याने ताजे व गरम अन्न एकत्र बसून जेवणाची सवय लागली आहे.

वाफवलेली कडधान्य वापरून आवश्यक भाज्या, फळांचे कापासह चाट सेवन करण्यात येत आहे.

ताज्या अन्नामुळे प्रतिकार शक्ती वाढते शिवाय घरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही सुधारली आहे. परिपूर्ण आहार घेण्यात येत असल्यामुळे अनेकांच्या आरोग्याबाबत छोट्या मोठ्या तक्रारी मात्र कमी झाल्या आहेत.

कोरोनामुळे मुले घरी आहेत. त्यामुळे दररोज गरम व ताजे अन्न खाण्याची सवय लागली आहे. चमचमीत पदार्थांपेक्षा पौष्टिक व सकस पदार्थ करून वाढण्यात समाधान आहे. बाहेरून तेलकट खाद्यपदार्थ आणणे बंद केले आहे. त्यामुळे मुलांनाही घरचेच अन्न आवडू लागले आहे.

- अर्चना बापट,

ताज्या अन्नाबरोबर फळे खाण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. सकाळचा नाष्टा, दोनवेळचे जेवण असो व मधल्या वेळचे खाणे यासाठी घरातच तयार करून देण्यात येत आहे. अन्य स्नॅक्स विकत आणून खायची सवय यामुळे मोडली गेली आहे. घरच्या अन्नाची गोडी लागली आहे.

- उज्ज्वला पाटील

गेल्या दीड वर्षात फास्टफूडकडील मुलांचा ओढा आपोआप कमी झाला आहे. मुलांनाही घरच्या अन्नाचे महत्त्व कळले असून चवही समजली आहे. भाज्या, कडधान्ये, फळे खाण्याची सवय लागली आहे. नाष्ट्यासुध्दा वेळेवर होत आहे. बेकरी उत्पादने खाण्याचे मुले आता टाळू लागली आहेत.

- प्रज्ञा खेडेकर