शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

कोरोनामुळे बदलले घराघरांतले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन करण्याकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर तेलकट, बेकरी उत्पादनासह, फास्टफूड टाळण्यात येत असून प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ आवर्जून सेवन करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे मुले घरी आहेत. ५० टक्के उपस्थितीमुळे नोकरदार पालकही बहुतांशवेळा घरी असतात. कोरोनाची भीती सर्रास सर्वांना वाटत असल्याने मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पार्सल सुविधा उपलब्ध होत असली तरी बाहेरून अन्न मागविणे आवर्जुन टाळण्यात येत आहे. त्यामुळेच घरातच पौष्टिक पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जात आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

तेलकट, तुपाचे, मैदायुक्त बेकरी उत्पादने टाळून भाजी-भाकरी, पोळी भाजी खाण्याचा विशेष आग्रह राहत आहे. पालेभाज्यांना तर सर्वाधिक मागणी होत आहे. भाकरीमध्ये नाचणीला विशेष पसंती होत आहे.

मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी, नाचणीचे सत्त्व, फळांचे आवर्जून सेवन केले जाते. फास्टफूड ऐवजी नाष्ट्याला मुलांना मिश्र डाळींचे धिरडे, चटणी, अप्पे, मधल्या वेळेसाठी पौष्टिक लाडू देण्यात येत आहेत.

लिंबूवर्णीय फळांबरोबर खजूर, सुका मेवा, शेंगदाणा, गुळाचे सेवन करण्यात येते. पावसाळ्यातील गारव्यामुळे मेथी, डिंक, खारीक वापरून लाडू, वड्या तयार करण्यात येतात. एकूणच परिपूर्ण आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळविण्यावर अधिक भर आहे. यामुळे मुलांचे अन्य खाणे कमी झाले आहे.

वेळेवर जेवणाची सवय

लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित असल्याने ताजे व गरम अन्न एकत्र बसून जेवणाची सवय लागली आहे.

वाफवलेली कडधान्य वापरून आवश्यक भाज्या, फळांचे कापासह चाट सेवन करण्यात येत आहे.

ताज्या अन्नामुळे प्रतिकार शक्ती वाढते शिवाय घरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही सुधारली आहे. परिपूर्ण आहार घेण्यात येत असल्यामुळे अनेकांच्या आरोग्याबाबत छोट्या मोठ्या तक्रारी मात्र कमी झाल्या आहेत.

कोरोनामुळे मुले घरी आहेत. त्यामुळे दररोज गरम व ताजे अन्न खाण्याची सवय लागली आहे. चमचमीत पदार्थांपेक्षा पौष्टिक व सकस पदार्थ करून वाढण्यात समाधान आहे. बाहेरून तेलकट खाद्यपदार्थ आणणे बंद केले आहे. त्यामुळे मुलांनाही घरचेच अन्न आवडू लागले आहे.

- अर्चना बापट,

ताज्या अन्नाबरोबर फळे खाण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. सकाळचा नाष्टा, दोनवेळचे जेवण असो व मधल्या वेळचे खाणे यासाठी घरातच तयार करून देण्यात येत आहे. अन्य स्नॅक्स विकत आणून खायची सवय यामुळे मोडली गेली आहे. घरच्या अन्नाची गोडी लागली आहे.

- उज्ज्वला पाटील

गेल्या दीड वर्षात फास्टफूडकडील मुलांचा ओढा आपोआप कमी झाला आहे. मुलांनाही घरच्या अन्नाचे महत्त्व कळले असून चवही समजली आहे. भाज्या, कडधान्ये, फळे खाण्याची सवय लागली आहे. नाष्ट्यासुध्दा वेळेवर होत आहे. बेकरी उत्पादने खाण्याचे मुले आता टाळू लागली आहेत.

- प्रज्ञा खेडेकर