शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बदलले घराघरांतले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आरोग्य सुरक्षेबरोबर फिटनेस महत्त्वाचा मानला जात असल्याने कोरोनामुळे घरोघरी गरम-गरम व ताजे अन्न सेवन करण्याकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर तेलकट, बेकरी उत्पादनासह, फास्टफूड टाळण्यात येत असून प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ आवर्जून सेवन करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे मुले घरी आहेत. ५० टक्के उपस्थितीमुळे नोकरदार पालकही बहुतांशवेळा घरी असतात. कोरोनाची भीती सर्रास सर्वांना वाटत असल्याने मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पार्सल सुविधा उपलब्ध होत असली तरी बाहेरून अन्न मागविणे आवर्जुन टाळण्यात येत आहे. त्यामुळेच घरातच पौष्टिक पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जात आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

तेलकट, तुपाचे, मैदायुक्त बेकरी उत्पादने टाळून भाजी-भाकरी, पोळी भाजी खाण्याचा विशेष आग्रह राहत आहे. पालेभाज्यांना तर सर्वाधिक मागणी होत आहे. भाकरीमध्ये नाचणीला विशेष पसंती होत आहे.

मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी, नाचणीचे सत्त्व, फळांचे आवर्जून सेवन केले जाते. फास्टफूड ऐवजी नाष्ट्याला मुलांना मिश्र डाळींचे धिरडे, चटणी, अप्पे, मधल्या वेळेसाठी पौष्टिक लाडू देण्यात येत आहेत.

लिंबूवर्णीय फळांबरोबर खजूर, सुका मेवा, शेंगदाणा, गुळाचे सेवन करण्यात येते. पावसाळ्यातील गारव्यामुळे मेथी, डिंक, खारीक वापरून लाडू, वड्या तयार करण्यात येतात. एकूणच परिपूर्ण आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळविण्यावर अधिक भर आहे. यामुळे मुलांचे अन्य खाणे कमी झाले आहे.

वेळेवर जेवणाची सवय

लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित असल्याने ताजे व गरम अन्न एकत्र बसून जेवणाची सवय लागली आहे.

वाफवलेली कडधान्य वापरून आवश्यक भाज्या, फळांचे कापासह चाट सेवन करण्यात येत आहे.

ताज्या अन्नामुळे प्रतिकार शक्ती वाढते शिवाय घरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही सुधारली आहे. परिपूर्ण आहार घेण्यात येत असल्यामुळे अनेकांच्या आरोग्याबाबत छोट्या मोठ्या तक्रारी मात्र कमी झाल्या आहेत.

कोरोनामुळे मुले घरी आहेत. त्यामुळे दररोज गरम व ताजे अन्न खाण्याची सवय लागली आहे. चमचमीत पदार्थांपेक्षा पौष्टिक व सकस पदार्थ करून वाढण्यात समाधान आहे. बाहेरून तेलकट खाद्यपदार्थ आणणे बंद केले आहे. त्यामुळे मुलांनाही घरचेच अन्न आवडू लागले आहे.

- अर्चना बापट,

ताज्या अन्नाबरोबर फळे खाण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. सकाळचा नाष्टा, दोनवेळचे जेवण असो व मधल्या वेळचे खाणे यासाठी घरातच तयार करून देण्यात येत आहे. अन्य स्नॅक्स विकत आणून खायची सवय यामुळे मोडली गेली आहे. घरच्या अन्नाची गोडी लागली आहे.

- उज्ज्वला पाटील

गेल्या दीड वर्षात फास्टफूडकडील मुलांचा ओढा आपोआप कमी झाला आहे. मुलांनाही घरच्या अन्नाचे महत्त्व कळले असून चवही समजली आहे. भाज्या, कडधान्ये, फळे खाण्याची सवय लागली आहे. नाष्ट्यासुध्दा वेळेवर होत आहे. बेकरी उत्पादने खाण्याचे मुले आता टाळू लागली आहेत.

- प्रज्ञा खेडेकर