शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सशक्त भातरोपांची नियंत्रित लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

दुसऱ्या सूत्राप्रमाणे चिखलणी करून खाचर तयार केल्यानंतर तुसाची काळी राख वापरून तयार केलेल्या भाताच्या ३-४ आठवड्यांच्या सशक्त रोपांची नियंत्रित ...

दुसऱ्या सूत्राप्रमाणे चिखलणी करून खाचर तयार केल्यानंतर तुसाची काळी राख वापरून तयार केलेल्या भाताच्या ३-४ आठवड्यांच्या सशक्त रोपांची नियंत्रित लावणी करावी. म्हणजेच रोपे सुधारित अंतरावर लावावी. त्यामुळे आव्यांची संख्या प्रतिचाैरस मीटरला २५ ठेवली जाते. सुधारित जातींना स्थानिक भातापेक्षा जास्त फुटवे येतात. त्यामुळे प्रत्येक आव्यात २ ते ३ रोपांपेक्षा जास्त रोपे लावू नयेत. नियंत्रित भातलावणीसाठी खालील दोन पद्धती विकसित केलेल्या आहेत.

बांबू मार्गदर्शक लावणी पद्धत

एक चार मीटर लांबीचा सरळ बांबू, साधी अगर प्लास्टिकची सुतळी व कोयता इतके साहित्य असले की, शेतकरी स्वत:च्या शेतावरच बांबू मार्गदर्शक तयार करू शकतो. बांबू मार्गदर्शकाची लांबी उपलब्ध असलेल्या कामगारांच्या संख्येनुसार (एका कामगारास १४५ ते १८५ सेंटीमीटर) कमी-अधिक ठेवावी. बांबू मार्गदर्शक वापरून शेतकरी फक्त दोन कामगारांच्या मदतीने उत्तम लावणी करू शकतो.

दोन ओळी लावणी पद्धत

ही लावणी पद्धत पूर्वी जपानी लावणी पद्धतीप्रमाणेच आहे. फक्त लावणीस कमी मजूर लावावेत व चाैथ्या सूत्राप्रमाणे ब्रिकेट खताचा वापर सहज, सोप्या रीतीने करता यावा म्हणून त्या लावणी पद्धतीत खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत. रोपांमधील अंतर सुधारित २० बाय २० सेंटीमीटर राखण्यासाठी लावणी दोरीच्या खुणांमधील अंतर आलटून-पालटून २५ सेंटीमीटर, १५ सेंटीमीटर असे ठेवले आहे. एकाच वेळी दोन ओळी लावल्या जातात. त्यानंतर कामगार (२० सेंटीमीटर अंतराऐवजी) प्रत्येक वेळी ४० सेंटीमीटर मागे सरकतात.

खताचा कार्यक्षम वापर

ज्या रासायनिक खताच्या वापरामुळे भाताचे उत्पादन लक्षणीय वाढले व भारतात भातामध्ये हरितक्रांती झाली. तीच खते कोकणातील व घाटावरील शेतकरी अद्यापही हव्या त्या प्रमाणात वापरत नाहीत. त्याला कारणे बरीच आहेत. ती महाग आहेत, ती वापरण्यासाठी कार्यक्षम पद्धती नाही. बऱ्याच वेळा भातखाचरात फेकून टाकलेले खत पावसाच्या जोरदार सरीमुळे पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. शेतकऱ्यांना परवडेल असे स्फुरद वापरण्याची पद्धत विकसित केली आहे.