शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

रत्नागिरी : रविवार दुपारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी भरणे, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद पडणे आदी ...

रत्नागिरी : रविवार दुपारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी भरणे, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद पडणे आदी घटना घडल्या आहेत. संततधारेने राजापूर तालुक्यातील कोदवली आणि संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०४२.७० (सरासरी ११५.८६) मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून, सोमवारी एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

हवामान खात्याने दि. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली होती. शुक्रवारी व शनिवारी पावसाचे प्रमाण तितकेसे नव्हते. मात्र, रविवारपासून पावसाने झोडपायला सुरूवात केली आहे. रात्रीपासून जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंदविलेल्या २४ तासांच्या अहवालानुसार, राजापूर तालुक्यात सर्वाधिक १५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये १००पेक्षा अधिक आणि १३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद आहे. दापाेली आणि रत्नागिरीतही जाेरदार वृष्टी सुरू आहे.

गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे सोमवारीही राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, अर्जुना नदीपात्रातले पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. शीळ भागाकडे जाणारा रस्ताही जलमय झाला आहे. जवाहर चाैकात, बाजारपेठेत, ओणी - पाचल मार्गावर पाणी भरले आहे. दापोली मार्गावर फुरूसजवळ रस्त्यावर झाड पडल्याने दीड तास वाहतूक बंद होती, आता ती सुरळीत करण्यात आली आहे. गुहागर, खेड, रत्नागिरी आणि लांजामध्येही पावसाची संततधार कायम होती.