शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

जिल्ह्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

रत्नागिरी : रविवार दुपारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी भरणे, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद पडणे आदी ...

रत्नागिरी : रविवार दुपारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी भरणे, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद पडणे आदी घटना घडल्या आहेत. संततधारेने राजापूर तालुक्यातील कोदवली आणि संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०४२.७० (सरासरी ११५.८६) मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून, सोमवारी एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

हवामान खात्याने दि. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली होती. शुक्रवारी व शनिवारी पावसाचे प्रमाण तितकेसे नव्हते. मात्र, रविवारपासून पावसाने झोडपायला सुरूवात केली आहे. रात्रीपासून जोर अधिकच वाढला आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंदविलेल्या २४ तासांच्या अहवालानुसार, राजापूर तालुक्यात सर्वाधिक १५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये १००पेक्षा अधिक आणि १३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद आहे. दापाेली आणि रत्नागिरीतही जाेरदार वृष्टी सुरू आहे.

गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे सोमवारीही राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, अर्जुना नदीपात्रातले पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. शीळ भागाकडे जाणारा रस्ताही जलमय झाला आहे. जवाहर चाैकात, बाजारपेठेत, ओणी - पाचल मार्गावर पाणी भरले आहे. दापोली मार्गावर फुरूसजवळ रस्त्यावर झाड पडल्याने दीड तास वाहतूक बंद होती, आता ती सुरळीत करण्यात आली आहे. गुहागर, खेड, रत्नागिरी आणि लांजामध्येही पावसाची संततधार कायम होती.