शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यमापनावरून शिक्षकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. वास्तविक ‘डायट’सारखी संस्था असताना खासगी संस्थांच्या माध्यमातून मूल्यमापनाचा घाट सुरू आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रावस्था तर आहे, शिवाय शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

वास्तविक गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी तर जानेवारीत पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले होते; मात्र पहिली ते चाैथीपर्यंत वर्गाचे ऑनलाइनच अध्यापन सुरू होते. कोरोना संकटामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

कोरोनामुळे वर्षभर मुले घरी आहेत. प्राथमिक शाळेचे अध्यापन तर वर्षभर ऑनलाइनच राहिले. वार्षिक परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चाचणी किंवा परीक्षेतील गुणांवरून शिक्षकांचे मूल्यमापन करण्याबाबत विचार सुरू आहे. मूल्यमापनासाठी तर शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची कोट्यवधी रुपयांची निविदाही काढण्यात आली आहे. शिक्षकांमध्ये याबाबत माहिती पसरली असून, परीक्षाच नाही तर मूल्यमापन कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षण व मूल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी निविदाही मागविली आहे. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांची माहिती संकलित करणाऱ्या सरल प्रणालीतील माहितीशी ही नवी प्रणाली जोडली जाणार आहे. विद्यार्थी संख्या व त्यांचे गुण यांची नोंद नवीन प्रणालीत केली जाणार आहे. त्यानुसार त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. प्रशिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची यंत्रणा असावी, असे म्हटले आहे; मात्र हे धोरण चुकीचे असल्याचे सांगत शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

----------------------

शासनाने गुणवत्तेचे निकष लावण्याचे निश्चित केले असले तरी, मात्र ते सर्व विभागांना असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन चुकीची संकल्पना असून, शासनाने या धोरणाबाबत पुन्हा विचार करावा.

- विजयकुमार रुग्गे, निवृत्त प्राचार्य.

--------------------

शिक्षकांचे मूल्यमापनच करायचे असेल तर केंद्रप्रमुखांपासून अगदी विस्तार संचालकांपर्यंत यंत्रणा आहे. त्यासाठी वेगळ्या यंत्रणेची आवश्यकता कशासाठी? दरवर्षी वार्षिक तपासणीतून मुलांसह शिक्षकांचेही मूल्यमापन होत असते. शासनाने विद्यार्थी गुणवत्तेनुसार मूल्यमापन वेगळ्या संस्थेमार्फत राबविण्याचे ठरविले तर त्याला कडाडून विरोध करणार.

- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी.

----------------------

जिल्ह्यातील प्राथमिक शाळा २५७४

प्राथमिक शिक्षक ७०००

नगर परिषदेचे शिक्षक १५०