शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

शासनाच्या आदेशाबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा ...

अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा व्यवसाय बंद राहणार आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परमीटधारक रिक्षाचालक मालकांना १५०० रुपये मिळणार आहेत. हे पैसे उपप्रादेशिक कार्यालयाकडून रिक्षा मालकांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही मिळणारी मदत तुटपुंजी असून, त्याची अंमलबजावणी कधीपासून हाेणार, याबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून पाच किलो धान्य मोफत दिले होते. याच धर्तीवर राज्य सरकार पाच किलो धान्य मोफत देणार आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा विभागाकडून होणार आहे. धान्य दुकानातून संबंधित लाभार्थींना लवकरच हे धान्य दिले जाणार आहे. कडक लाॅकडाऊन असल्याने संचारबंदी केली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन करून लाभार्थ्यांना कळविले जाणार आहे.

शहरासह ग्रामीण भागात अनेक रिक्षा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत येणार आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने १५०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी हाेणार, त्यासाठी नाेंदणी काेठे करावी याबाबतची काेणतीच स्पष्ट माहिती रिक्षाचालकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रमच आहे. तसेच शहरातील जुना एस.टी. स्टँड, बहादुरशेखनाका या ठिकाणी गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे याची घोषणा शासनाने केली असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.