शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या आदेशाबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा ...

अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा व्यवसाय बंद राहणार आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परमीटधारक रिक्षाचालक मालकांना १५०० रुपये मिळणार आहेत. हे पैसे उपप्रादेशिक कार्यालयाकडून रिक्षा मालकांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही मिळणारी मदत तुटपुंजी असून, त्याची अंमलबजावणी कधीपासून हाेणार, याबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून पाच किलो धान्य मोफत दिले होते. याच धर्तीवर राज्य सरकार पाच किलो धान्य मोफत देणार आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा विभागाकडून होणार आहे. धान्य दुकानातून संबंधित लाभार्थींना लवकरच हे धान्य दिले जाणार आहे. कडक लाॅकडाऊन असल्याने संचारबंदी केली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन करून लाभार्थ्यांना कळविले जाणार आहे.

शहरासह ग्रामीण भागात अनेक रिक्षा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत येणार आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने १५०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी हाेणार, त्यासाठी नाेंदणी काेठे करावी याबाबतची काेणतीच स्पष्ट माहिती रिक्षाचालकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रमच आहे. तसेच शहरातील जुना एस.टी. स्टँड, बहादुरशेखनाका या ठिकाणी गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे याची घोषणा शासनाने केली असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.