शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

काटकसरीसाठी ३५ पदांवर गंडांतर

By admin | Updated: February 10, 2015 00:02 IST

ग्रामीण आरोग्य अभियान : पदे कमी करण्याविषयीचे अभिप्राय मागवले...

रत्नागिरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या खर्चात काटकसर करण्यासाठी यामध्ये काम करीत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना कमी करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ३५ पदांवर गडांतर येणार आहे. कोणती पदे कमी करावीत, याविषयीचे अभिप्राय जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडून आले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या पदांबाबत स्टेट हेल्थ रिसर्च सेंटरने एक अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार राज्यामध्ये २५६२ पदांची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय शासनाला देण्यात आला आहे. हा अहवाल फिल्ड सर्व्हे न करता एकाच जागी बसून करण्यात आला आहे. तसेच हा अहवाल वस्तुस्थितीवर आधारित नसून काही पदांविषयी आकस ठेवून तयार करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी केला आहे. जिल्ह्याला ६१७ पदे मंजूर असून, ५२२ पदे कार्यरत आहेत. सध्यस्थितीमध्ये जिल्ह्यात या अभियानातंर्गत विविध वर्गातील ९५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रिक्त पदांमुळे अपुरे कर्मचारी असतानाही शासनाकडून पदे करण्याचा घाट चालवण्यात आला आहे. या अभियानामध्ये काम करणारे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. तरीही शासनाकडून विविध पदे रद्द करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ३५ पदांचा समावेश आहे.या अभियानांतर्गत काम करणाऱ्या आशा कार्यकर्तींना केलेल्या कामाचा मेहनताना व विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागतात. आधीच आरोग्य विभागात कर्मचारी कमी असताना त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. हे अभियान म्हणजे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आधार आहे. आता या अभियानाच्या कर्मचाऱ्यांची पदे रद्द करुन तो आधारच काढून घेण्याचा घाट शासनाकडून घालण्यात येत आहे. या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आधीच पदे कमी असताना आणखी पदे कमी करणे म्हणजेच या अभियानाचा टप्प्याटप्प्याने गाशा गुंडाळण्याचे काम शासनाकडून सुरु आहे. या अभियानांतर्गत सध्यस्थितीत कार्यरत असलेली पदे कमी करु नयेत. तसेच एकही पद कमी केल्यास संघटनेकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्याचा इशारा या महासंघाने कुटुंबकल्याण व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना दिला आहे. (शहर वार्ताहर)आरोग्य सेवा खिळखिळीजिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांना गावातील आरोग्य सुविधांच्या अभावी खासगी रुग्णालयात जाऊन अधिक पैसे खर्च करावे लागतात. आरोग्य विभागाला आधार असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची पदे रद्द करुन आरोग्य सेवा खिळखिळी करण्याचा डाव शासनाकडून आखण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.