शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

सवलत दिली, परंतु नियम पाळा : पालकमंत्री परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांनी कोविडचे ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केले. १५ ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ध्वजारोहणानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऑनलाईन बैठकीत विविध विषयांची माहिती घेतली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते. अन्य लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.

चिपळूण व खेडमधील अतिवृष्टी आणि त्यापूर्वी तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषद शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शाळा सुरु करण्याचा निर्णय झाल्यास अडचण निर्माण होईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी आपल्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळा उभारण्याची जबाबदारी घ्यावी, असे आमदार भास्कर जाधव यांनी सुचविले. याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. चिपळूण आणि खेडमधील नुकसानग्रस्त दुकानांच्या गुमास्ता परवान्यासह इतर आवश्यक कागदपत्रांबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. केंद्राकडून जे व्हेंटिलेटर प्राप्त झाले त्यातील निम्म्याहून अधिक बंद असल्याची तक्रार आहे, असे खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांनी सांगितले. याबाबत प्रत्यक्ष त्याठिकाणी वस्तुस्थिती काय आहे, याची तपासणी करुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध साधने व त्यातील तूट याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली. लसीकरण स्थिती आणि आगामी काळाचे नियोजन यावरही यावेळी चर्चा झाली.

ठिकठिकाणावरुन जे रुग्ण येथील जिल्हा रुग्णालयात अथवा महिला रुग्णालयात दाखल येतात, त्यांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था नाही. यासाठी निवारागृह उभारण्याची मागणी आहे. याबाबतचा मुद्दा जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी मांडला. ही मागणी लक्षात घेऊन १ कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर केला. रुग्णालय परिसरात चांगल्या पद्धतीचे निवारागृह बांधण्याचे नियोजन पूर्णतेस यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.