शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सवलत दिली, परंतु नियम पाळा : पालकमंत्री परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांनी कोविडचे ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केले. १५ ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ध्वजारोहणानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऑनलाईन बैठकीत विविध विषयांची माहिती घेतली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते. अन्य लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.

चिपळूण व खेडमधील अतिवृष्टी आणि त्यापूर्वी तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषद शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शाळा सुरु करण्याचा निर्णय झाल्यास अडचण निर्माण होईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी आपल्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळा उभारण्याची जबाबदारी घ्यावी, असे आमदार भास्कर जाधव यांनी सुचविले. याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. चिपळूण आणि खेडमधील नुकसानग्रस्त दुकानांच्या गुमास्ता परवान्यासह इतर आवश्यक कागदपत्रांबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. केंद्राकडून जे व्हेंटिलेटर प्राप्त झाले त्यातील निम्म्याहून अधिक बंद असल्याची तक्रार आहे, असे खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांनी सांगितले. याबाबत प्रत्यक्ष त्याठिकाणी वस्तुस्थिती काय आहे, याची तपासणी करुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध साधने व त्यातील तूट याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली. लसीकरण स्थिती आणि आगामी काळाचे नियोजन यावरही यावेळी चर्चा झाली.

ठिकठिकाणावरुन जे रुग्ण येथील जिल्हा रुग्णालयात अथवा महिला रुग्णालयात दाखल येतात, त्यांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था नाही. यासाठी निवारागृह उभारण्याची मागणी आहे. याबाबतचा मुद्दा जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी मांडला. ही मागणी लक्षात घेऊन १ कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर केला. रुग्णालय परिसरात चांगल्या पद्धतीचे निवारागृह बांधण्याचे नियोजन पूर्णतेस यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.