शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

जिल्हा रुग्णालयात नियमांचे पालन; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय असले तरीही आता कोरोना विभाग स्वतंत्र करून नाॅन कोविड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय असले तरीही आता कोरोना विभाग स्वतंत्र करून नाॅन कोविड रुग्णालयही सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व डाॅक्टर्स, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांच्याकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंग, आदी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.

रुग्णाच्या एकाच नातेवाइकाला आत प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रथम त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. ही चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्या नातेवाइकालाही कोरोना रुग्णालयात दाखल केले जाते. आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत.

याआधी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत असत. आता हा प्रकार कमी झाला आहे. कोरोनाचे नियम सर्वांसाठीच काटेकोर करण्यात आले आहेत.

रुग्णालयांमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी दोन स्वतंत्र प्रवेश ठेवले आहेत. त्यामुळे गर्दी कमी होत आहे. येणारे मास्क वापरत आहेत का, यावरही लक्ष राहत आहे. जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

ओपीडी हाऊसफुल्ल

सध्या जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयासह नाॅन कोविड रुग्णालय म्हणूनही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इतर आजाराचे रुग्णही जिल्हाभरातून या रुग्णालयात येत आहेत. सध्या बदलत्या वातावरणामुळे इतर आजारांबरोबरच तापसरी, सर्दीचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालयाची ओपीडी वाढली आहे.

तापसरी, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेेे.....

सध्या पाऊस आणि मध्येच उन्हाळा असे संमिश्र वातावरण असल्याने नागरिकांमध्ये तापसरी, खोकला, सर्दी - पडसे, आदी आजार बळावले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाच्या चाचण्या आरोग्य विभागाकडून वाढविण्यात आल्या आहेत.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अथवा येणाऱ्या व्यक्ती या काेरोनाच्या सुपर स्प्रेडर ठरू नयेत, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

रुग्णाच्या एकाच नातेवाइकाला रुग्णालयात आत साेडले जाते. त्यासाठी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यानंतरच आत येण्यासाठी पास दिला जातो. एकच नातेवाईक रुग्णासोबत राहत असल्याने रुग्णालयात हुज्जत घालण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही रुग्णाकडे चांगले लक्ष देण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.

- डॉ. संघमित्रा फुले,

जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.