शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा रुग्णालयात नियमांचे पालन; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय असले तरीही आता कोरोना विभाग स्वतंत्र करून नाॅन कोविड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय असले तरीही आता कोरोना विभाग स्वतंत्र करून नाॅन कोविड रुग्णालयही सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व डाॅक्टर्स, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांच्याकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंग, आदी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.

रुग्णाच्या एकाच नातेवाइकाला आत प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रथम त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. ही चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्या नातेवाइकालाही कोरोना रुग्णालयात दाखल केले जाते. आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत.

याआधी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत असत. आता हा प्रकार कमी झाला आहे. कोरोनाचे नियम सर्वांसाठीच काटेकोर करण्यात आले आहेत.

रुग्णालयांमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी दोन स्वतंत्र प्रवेश ठेवले आहेत. त्यामुळे गर्दी कमी होत आहे. येणारे मास्क वापरत आहेत का, यावरही लक्ष राहत आहे. जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

ओपीडी हाऊसफुल्ल

सध्या जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयासह नाॅन कोविड रुग्णालय म्हणूनही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इतर आजाराचे रुग्णही जिल्हाभरातून या रुग्णालयात येत आहेत. सध्या बदलत्या वातावरणामुळे इतर आजारांबरोबरच तापसरी, सर्दीचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालयाची ओपीडी वाढली आहे.

तापसरी, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेेे.....

सध्या पाऊस आणि मध्येच उन्हाळा असे संमिश्र वातावरण असल्याने नागरिकांमध्ये तापसरी, खोकला, सर्दी - पडसे, आदी आजार बळावले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाच्या चाचण्या आरोग्य विभागाकडून वाढविण्यात आल्या आहेत.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अथवा येणाऱ्या व्यक्ती या काेरोनाच्या सुपर स्प्रेडर ठरू नयेत, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

रुग्णाच्या एकाच नातेवाइकाला रुग्णालयात आत साेडले जाते. त्यासाठी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यानंतरच आत येण्यासाठी पास दिला जातो. एकच नातेवाईक रुग्णासोबत राहत असल्याने रुग्णालयात हुज्जत घालण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही रुग्णाकडे चांगले लक्ष देण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.

- डॉ. संघमित्रा फुले,

जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.