शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. ...

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. पंचनामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.

चिपळूणमध्ये २२ जुलैला महापूर आला होता. त्याची पाहणी करण्यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे गुरुवारी चिपळूणच्या दौऱ्यावर होते. त्यांनी खेर्डी, काविळतळीसह शहराच्या काही भागात जाऊन नुकसानाची पाहणी केली. ज्या भागात ते पाहणीसाठी गेले, तेथे पाणी किती फूट भरले होते, लोकांचे काय काय नुकसान झाले, जीवित हानी झाली का, शेतीचे किती नुकसान झाले, याची माहिती ते अधिकाऱ्यांकडून घेत होते.

पाहणी दौरा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळुणातील पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रत्येकाला मदत मिळेल असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. परंतु मदतीचा अंदाज येण्यासाठी पंचनामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ते झाल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. पूर ओसरल्यानंतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. चिपळूणमध्येही रोगराईचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे.

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ही वेळ टीका करण्याची नाही. एकमेकांना मदत करून पुन्हा एकदा चिपळूण उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार आणि माझे लक्ष त्याकडे आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

...............

ताफा अडवण्याचा प्रयत्न

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे काविळतळी भागात आल्यानंतर तेथील काही लोकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मंत्री, आमदार, खासदार चिपळूणला नुसते दौरे करत आहेत. मदत कोणीही करत नाही, अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावेळी गोंधळ उडाला. मंत्री ठाकरे यांनी सर्वांना मदत मिळेल, असे आश्वासन दिले. पोलीस यंत्रणा प्रशासन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.