शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. ...

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. पंचनामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.

चिपळूणमध्ये २२ जुलैला महापूर आला होता. त्याची पाहणी करण्यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे गुरुवारी चिपळूणच्या दौऱ्यावर होते. त्यांनी खेर्डी, काविळतळीसह शहराच्या काही भागात जाऊन नुकसानाची पाहणी केली. ज्या भागात ते पाहणीसाठी गेले, तेथे पाणी किती फूट भरले होते, लोकांचे काय काय नुकसान झाले, जीवित हानी झाली का, शेतीचे किती नुकसान झाले, याची माहिती ते अधिकाऱ्यांकडून घेत होते.

पाहणी दौरा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळुणातील पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रत्येकाला मदत मिळेल असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. परंतु मदतीचा अंदाज येण्यासाठी पंचनामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ते झाल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. पूर ओसरल्यानंतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. चिपळूणमध्येही रोगराईचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे.

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ही वेळ टीका करण्याची नाही. एकमेकांना मदत करून पुन्हा एकदा चिपळूण उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार आणि माझे लक्ष त्याकडे आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

...............

ताफा अडवण्याचा प्रयत्न

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे काविळतळी भागात आल्यानंतर तेथील काही लोकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मंत्री, आमदार, खासदार चिपळूणला नुसते दौरे करत आहेत. मदत कोणीही करत नाही, अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावेळी गोंधळ उडाला. मंत्री ठाकरे यांनी सर्वांना मदत मिळेल, असे आश्वासन दिले. पोलीस यंत्रणा प्रशासन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.