शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. ...

चिपळूण : परिसरात महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर केली जाईल. पंचनामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.

चिपळूणमध्ये २२ जुलैला महापूर आला होता. त्याची पाहणी करण्यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे गुरुवारी चिपळूणच्या दौऱ्यावर होते. त्यांनी खेर्डी, काविळतळीसह शहराच्या काही भागात जाऊन नुकसानाची पाहणी केली. ज्या भागात ते पाहणीसाठी गेले, तेथे पाणी किती फूट भरले होते, लोकांचे काय काय नुकसान झाले, जीवित हानी झाली का, शेतीचे किती नुकसान झाले, याची माहिती ते अधिकाऱ्यांकडून घेत होते.

पाहणी दौरा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळुणातील पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रत्येकाला मदत मिळेल असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. परंतु मदतीचा अंदाज येण्यासाठी पंचनामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ते झाल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. पूर ओसरल्यानंतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. चिपळूणमध्येही रोगराईचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे.

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ही वेळ टीका करण्याची नाही. एकमेकांना मदत करून पुन्हा एकदा चिपळूण उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार आणि माझे लक्ष त्याकडे आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

...............

ताफा अडवण्याचा प्रयत्न

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे काविळतळी भागात आल्यानंतर तेथील काही लोकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मंत्री, आमदार, खासदार चिपळूणला नुसते दौरे करत आहेत. मदत कोणीही करत नाही, अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावेळी गोंधळ उडाला. मंत्री ठाकरे यांनी सर्वांना मदत मिळेल, असे आश्वासन दिले. पोलीस यंत्रणा प्रशासन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.