शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात ज्याचे नुकसान त्यालाच भरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु असताना भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु असताना भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. अशातच पंचनामे करताना भाडेकरूंकडे करारनाम्याची मागणी केली जात असल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी ज्यांचे नुकसान त्यांनाच भरपाई मिळणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

महापुरामुळे चिपळूण शहरातील ९० टक्के भाग बाधित झाल्याने घरे, गोठे, दुकान, वाहन, शेती व सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या महापुरामुळे भाडेकरूंनाही तितकाच फटका बसला आहे. याआधीच कोरोनामुळे हवालदिल झालेले भाडेकरू, दुकानदार तर या महापुरामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. याआधी लॉकडाऊनमुळे व्यापार झाला नाही आणि आता महापुरामुळे होते नव्हते ते सारेच वाहून गेले आहे. त्यामुळे भाडेकरू अडचणीत आला आहे. चिपळूण बाजारपेठेतील काही दुकानदारांचे मासिक भाडे २५ हजारांपासून १ लाखांपर्यंत आहे. त्यातच लॉकडाऊन कालावधीत व आताही प्रतिज्ञापत्र व करारनाम्याची प्रक्रिया बंद होती. त्यामुळे अनेक भाडेकरूंकडे करारनामे उपलब्ध नाहीत तर काहींचे करारनामे पुरात वाहून गेले आहेत.

येथील बाजारपेठेतील जुन्या पेढ्या बंद पडल्याने बहुतांशी दुकाने भाडेकरूंच्या ताब्यात आहेत. तसेच लोटे, खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीतील कामगार व आजूबाजूच्या गावातील लोक नोकरीनिमित्ताने चिपळुणात भाड्याने राहतात. त्यामुळे शहरात किमान ३ हजारहून अधिक भाडेकरू कुटुंब व दुकानदार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुकान व घर मालकांऐवजी भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. याविषयी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्या असून, ज्या भाडेकरूंचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, परंतु तेथे भाडेकरूंचे नुकसान झाले आहे तर भाडेकरूंनाच नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्यानुसार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही पंचनामा करणाऱ्या पथकांना सूचना दिल्या आहेत. तरीही काही कर्मचारी भाडेकरू असलेल्या पूरग्रस्तांकडे करारनाम्याची मागणी करत असल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे.

------------------------------

महापुरात सर्वांचेच सरसकट नुकसान झाले आहे. यामध्ये भाडेकरूही भरडले गेले आहेत. मात्र, आता पंचनामे करताना भाडेकरूंना करारनामा आहे का, अशी विचारणा केली जात आहे. तसेच आधारकार्ड, बँक खाते याची कोणतीही माहिती न घेता पंचनामे केले जात आहेत. शिवाय पंचनामे झाल्याची कोणतीही पोच मिळत नाही. त्यामुळे नेमके काय चालले आहे, हेच कळत नाही.

- मंगेश वरपे, खेंड, चिपळूण.

---------------------------

महापुरात ज्याचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येकाला भरपाई मिळणार आहे. मग त्यामध्ये मालक असो अन्यथा भाडेकरू. जर घरात पाणी गेले, पण नुकसान भाडेकरूचे झाले तर नुकसानभरपाई भाडेकरूलाच मिळाली पाहिजे, अशाच पद्धतीच्या सूचना सर्व पंचनामे करणाऱ्या पथकांना देण्यात आल्या आहेत.

- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, चिपळूण.