शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

महापुरात ज्याचे नुकसान त्यालाच भरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु असताना भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु असताना भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. अशातच पंचनामे करताना भाडेकरूंकडे करारनाम्याची मागणी केली जात असल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी ज्यांचे नुकसान त्यांनाच भरपाई मिळणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

महापुरामुळे चिपळूण शहरातील ९० टक्के भाग बाधित झाल्याने घरे, गोठे, दुकान, वाहन, शेती व सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या महापुरामुळे भाडेकरूंनाही तितकाच फटका बसला आहे. याआधीच कोरोनामुळे हवालदिल झालेले भाडेकरू, दुकानदार तर या महापुरामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. याआधी लॉकडाऊनमुळे व्यापार झाला नाही आणि आता महापुरामुळे होते नव्हते ते सारेच वाहून गेले आहे. त्यामुळे भाडेकरू अडचणीत आला आहे. चिपळूण बाजारपेठेतील काही दुकानदारांचे मासिक भाडे २५ हजारांपासून १ लाखांपर्यंत आहे. त्यातच लॉकडाऊन कालावधीत व आताही प्रतिज्ञापत्र व करारनाम्याची प्रक्रिया बंद होती. त्यामुळे अनेक भाडेकरूंकडे करारनामे उपलब्ध नाहीत तर काहींचे करारनामे पुरात वाहून गेले आहेत.

येथील बाजारपेठेतील जुन्या पेढ्या बंद पडल्याने बहुतांशी दुकाने भाडेकरूंच्या ताब्यात आहेत. तसेच लोटे, खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीतील कामगार व आजूबाजूच्या गावातील लोक नोकरीनिमित्ताने चिपळुणात भाड्याने राहतात. त्यामुळे शहरात किमान ३ हजारहून अधिक भाडेकरू कुटुंब व दुकानदार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुकान व घर मालकांऐवजी भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. याविषयी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्या असून, ज्या भाडेकरूंचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, परंतु तेथे भाडेकरूंचे नुकसान झाले आहे तर भाडेकरूंनाच नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्यानुसार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही पंचनामा करणाऱ्या पथकांना सूचना दिल्या आहेत. तरीही काही कर्मचारी भाडेकरू असलेल्या पूरग्रस्तांकडे करारनाम्याची मागणी करत असल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे.

------------------------------

महापुरात सर्वांचेच सरसकट नुकसान झाले आहे. यामध्ये भाडेकरूही भरडले गेले आहेत. मात्र, आता पंचनामे करताना भाडेकरूंना करारनामा आहे का, अशी विचारणा केली जात आहे. तसेच आधारकार्ड, बँक खाते याची कोणतीही माहिती न घेता पंचनामे केले जात आहेत. शिवाय पंचनामे झाल्याची कोणतीही पोच मिळत नाही. त्यामुळे नेमके काय चालले आहे, हेच कळत नाही.

- मंगेश वरपे, खेंड, चिपळूण.

---------------------------

महापुरात ज्याचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येकाला भरपाई मिळणार आहे. मग त्यामध्ये मालक असो अन्यथा भाडेकरू. जर घरात पाणी गेले, पण नुकसान भाडेकरूचे झाले तर नुकसानभरपाई भाडेकरूलाच मिळाली पाहिजे, अशाच पद्धतीच्या सूचना सर्व पंचनामे करणाऱ्या पथकांना देण्यात आल्या आहेत.

- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, चिपळूण.