शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

या रे चिऊ काऊ, खा रे थोडा खाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : सध्याच्या कडक उन्हाळ्यात माणसाच्या जीवाची काहिली हाेते. आपण माणसे या उकाड्यात थंडाव्यासाठी अनेक उपाय ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : सध्याच्या कडक उन्हाळ्यात माणसाच्या जीवाची काहिली हाेते. आपण माणसे या उकाड्यात थंडाव्यासाठी अनेक उपाय करतो. मात्र, ज्या पशुपक्ष्यांना स्वतःचं घरदार नाही, हक्काचं पाणी नाही, त्या मुक्या प्राण्यांनी काय करावं? या मुक्या प्राण्यांसाठी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चंद्रनगर येथील विद्यार्थ्यांनी ‘दाणापाण्याची’ व्यवस्था करून छोट्याशा वयातच सामाजिक भान जपलं आहे.

सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने संपूर्ण जगालाच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. माणूस स्वतःच्या सुखसोयींसाठी निसर्गाची कत्तल करीत आहे. त्यामुळेच तापमान कमालीचं वाढलं आहे. अशा वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी माणसाने अनेक उपकरणं शोधून काढली आहेत. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे नैसर्गिक साठेही कोरडे पडले आहेत. अशा अनेक पर्यावरणविषयक समस्यांवर उपाय करण्यासाठी चंद्रनगर शाळेतील विद्यार्थी पदवीधर व उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असतात. नैसर्गिक पाण्याचे साठे कोरडे पडल्याने पाण्यासाठी वणवण उडणारी पाखरे पाहून या पाखरांसाठी आपण काहीतरी करायला हवे, हा विचार पुढे आल्यावर बाबू घाडीगांवकर यांच्या कल्पनेतून ‘या रे चिऊ काऊ, खा रे थोडा खाऊ’ हा उपक्रम मुलांनी प्रत्यक्ष करायचं ठरवलं.

शालेय विद्यार्थ्यांच्या या समाजभानाचं शाळेच्या मुख्याध्यापिका कोळेकर, अर्चना सावंत, मानसी सावंत, मनोज वेदक, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अविकारी पद्मन लहांगे, दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व सर्व सदस्यांनी कौतुक केलं आहे.

चाैकट

टाकाऊ वस्तूंचा उपयाेग

घरात अडगळीत पडलेले तेलाचे कॅन कापून मुलांनी दोन भांडी तयार केली. एका भांड्यात पाणी, तर दुसऱ्या भांड्यात धान्य व्यवस्थित ठेवता येईल, अशा प्रकारे शाळेच्या बागेतल्या एका डेरेदार झाडाच्या फांद्यांना ही दोन्ही भांडी टांगून ठेवली आहेत. त्यामुळे पाखरांसाठी दाणापाण्याची व्यवस्था झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच आजूबाजूला भटकणारी पाखरे भांड्यांतील पाणी व दाणे खाऊ लागली.