शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काव्यसंग्रह प्रकाशित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण ...

दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण यांनी अनेक काव्यस्पर्धांमध्ये यश मिळवले असून, त्यांनी वर्तमानपत्र, मासिक, तसेच दिवाळी अंकांमध्येही लेखन केले आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या ‘जगण्याच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शब्दगंधा प्रकाशन, औरंगाबाद यांच्यामार्फत २३ जुलैरोजी होणार आहे.

मत्स्य प्रकल्पांकडे कल

रत्नागिरी : सागरी मत्स्योत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने कोळंबीसह गाेड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यास सुरुवात झाली आहे. कोळंबी मत्स्यसंवर्धन प्रकल्पांकडे कल वाढू लागला असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४० प्रकल्पांना परवानगी दिली आहे. यामधून वर्षाला शंभर टनाहून अधिक उत्नादन काढले जाते.

ठेकेदारच मिळेना

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाचा पूर्ण निधी अद्यापपर्यंत नगर परिषदेकडे प्राप्त नाही. त्यामुळे या कामाची निविदा भरण्यासाठी कोणताही मोठा विकासक पुढे आला नसल्याचा अंदाज आहे. गेल्या २५ दिवसांत एकाही ठेकेदाराने निविदा भरलेली नाही .

रोपांचे वाटप

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची वाहनचालक संघटना, लोटे येथील एक्सेल इडस्ट्रीज आणि कृषी महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना नारळ, सुपारी, रोपांचे वाटप करण्यात आले. केळशीतील दहा शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच नारळ रोपे व पाच सुपारी रोपे पाटप करण्यात आली.

बेरोजगारीची समस्या दूर होईल

आरवली : कोकणचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे आता कोकणचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होऊन बेरोजगारीची समस्या कमी होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केले आहे.

मुसळधार पाऊस

दापोली : दोन आठवडयांच्या विश्रांतीनंतर दापोली तालुक्यामध्ये रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. भातलावणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

संस्थांचा पुढाकार

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाने पालक मृत झालेल्या विद्यार्थ्यांना देवरूखमधील सामाजिक संस्था, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ व नेक्स्ट जनरेशन फाऊंडेशन शिक्षणाकरिता मदत करणार आहेत, अशी माहिती या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली. पालकांचे निधन झाल्यामुळे अनाथ मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

शेतकरी सुखावला

साखरपा : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी शिल्लक ठेवलेल्या भातलावणीच्या कामांना पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे.