शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काव्यसंग्रह प्रकाशित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण ...

दापोली : दापोलीतील युवा कवी जयंवत चव्हाण यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगण्याच्या कविता’ गुरूपौर्णिमेला प्रकाशित होणार आहे. कवी जयवंत चव्हाण यांनी अनेक काव्यस्पर्धांमध्ये यश मिळवले असून, त्यांनी वर्तमानपत्र, मासिक, तसेच दिवाळी अंकांमध्येही लेखन केले आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या ‘जगण्याच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शब्दगंधा प्रकाशन, औरंगाबाद यांच्यामार्फत २३ जुलैरोजी होणार आहे.

मत्स्य प्रकल्पांकडे कल

रत्नागिरी : सागरी मत्स्योत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने कोळंबीसह गाेड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यास सुरुवात झाली आहे. कोळंबी मत्स्यसंवर्धन प्रकल्पांकडे कल वाढू लागला असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४० प्रकल्पांना परवानगी दिली आहे. यामधून वर्षाला शंभर टनाहून अधिक उत्नादन काढले जाते.

ठेकेदारच मिळेना

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाचा पूर्ण निधी अद्यापपर्यंत नगर परिषदेकडे प्राप्त नाही. त्यामुळे या कामाची निविदा भरण्यासाठी कोणताही मोठा विकासक पुढे आला नसल्याचा अंदाज आहे. गेल्या २५ दिवसांत एकाही ठेकेदाराने निविदा भरलेली नाही .

रोपांचे वाटप

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची वाहनचालक संघटना, लोटे येथील एक्सेल इडस्ट्रीज आणि कृषी महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना नारळ, सुपारी, रोपांचे वाटप करण्यात आले. केळशीतील दहा शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच नारळ रोपे व पाच सुपारी रोपे पाटप करण्यात आली.

बेरोजगारीची समस्या दूर होईल

आरवली : कोकणचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे आता कोकणचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होऊन बेरोजगारीची समस्या कमी होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केले आहे.

मुसळधार पाऊस

दापोली : दोन आठवडयांच्या विश्रांतीनंतर दापोली तालुक्यामध्ये रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. भातलावणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

संस्थांचा पुढाकार

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाने पालक मृत झालेल्या विद्यार्थ्यांना देवरूखमधील सामाजिक संस्था, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ व नेक्स्ट जनरेशन फाऊंडेशन शिक्षणाकरिता मदत करणार आहेत, अशी माहिती या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली. पालकांचे निधन झाल्यामुळे अनाथ मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

शेतकरी सुखावला

साखरपा : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी शिल्लक ठेवलेल्या भातलावणीच्या कामांना पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे.