शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

स्वच्छता अभियान यापुढेही कायम

By admin | Updated: November 17, 2014 23:25 IST

विजयकुमार काळम-पाटील : दररोज मागवण्यात येतो स्वच्छतेचा अहवाल, दर महिन्याला ग्रामीण भागात पथक पाठवणार

जिल्ह्यात स्वच्छता अभियान यापुढे कायम सुरु ठेवण्यात येणार आहे़ त्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिन्याला एकदा पथक पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले़ जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात सर्वच स्तरावर आघाडी घेतली आहे़ ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, अंगणवाड्या तसेच पंचायत समिती कार्यालये यामध्ये स्वच्छता मोहिमेला जोर आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले आहेत़ या स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावचा आराखडा तयार केला आहे. त्या गावाला तयार करण्यात आलेल्या १६५ पथकांनी २ ते ३ वेळा भेटी देऊन तेथील स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात काम सुरु आहे़ त्याबाबतचा अहवाल दररोज मागवण्यात येत असल्याचे मुख कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले़अभियान सुरु करण्यापूर्वीचे फोटो, काम करतानाचे फोटो आणि त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटो घेण्यात यावेत, अशी सूचना प्रत्येक पथकाला देण्यात आली आहे. सर्व पथकांना दिवसासह वेळही ठरवून देण्यात आली आहे़ त्यामुळे कोणीही खोटा अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही़ त्यामध्येही कोणी खोटा अहवाल दिल्यास त्याची गय केली जाणार नाही़ त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़ ते पुढे म्हणाले, सुरुवातीला वजनदार गठ्ठे उचलण्यात कर्मचारी महिलाही मागे राहिल्या नसून, त्या प्रामाणिकपणे काम करीत आहेत़ पहिल्या टप्प्यात कागदाचे गठ्ठे, त्यावरील धूळ, जाळ्या साफ करणे, अनावश्यक साहित्य, ट्रकभर बॅटऱ्या, मोडके पंप, २३ वर्षांपासूनचे पडून असलेले मशिनही परिषद भवनातून उचलण्यात आले आहेत़ दुसऱ्या टप्प्यात अनावश्यक असलेली ३० वर्षातील कागदपत्र, १० वर्षांची कागदपत्र आणि एक वर्षाची कागदपत्र वेगवेगळी करण्यात आली. अनावश्यक, कालबाह्य कागदपत्र व स्क्रॅब मोडीत काढून जिल्हा परिषद स्वच्छ करण्यात आली़ तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक विभागाचे वऱ्हांडे स्वच्छ केले आहेत़ तसेच प्रत्येक महिन्यात कृती करुन त्या-त्या विभागाने परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे़ त्यामुळे यापुढे ही स्वच्छता कायम राहणार असल्याचा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला़ अभियानाबद्दल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन रात्री उशिरापर्यंत स्वच्छतेचे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी राबवलेल्या या अभियानावर डाक्युमेंटरी फिल्म तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ - रहिम दलाल