शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

लाॅकडाऊनची घाेषणा होताच खरेदीसाठी नागरिक बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे जिल्हा प्रशासनाने आठवडाभराचे कडकडीत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जाहीर केला. आठवडाभराचे लाॅकडाऊन होणार ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे जिल्हा प्रशासनाने आठवडाभराचे कडकडीत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जाहीर केला. आठवडाभराचे लाॅकडाऊन होणार असल्याने मंगळवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. भाजीपाला, कांदा, किराणा खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या.

जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून लाॅकडाऊनची घोषणा केली होती. सोशल मीडियाव्दारे रात्रीच वृत्त नागरिकांपर्यंत पोहोचले होते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सकाळी ७ ते ११ वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी असल्याने ग्राहकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. धनजी नाका, माळनाका, मारुती मंदिर, कोकणनगर परिसरात भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मटण, चिकन विक्रेत्यांकडेही रांगा लागल्या होत्या. किराणा दुकानदारांसमाेर खरेदीसाठी ग्राहक रांगेत उभे होते. लाॅकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येणार नाही; परंतु, गाड्यांमध्ये इंधन असावे यासाठी पेट्रोल, डिझेलसाठी पंपापासून रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. कोरोना संसर्गाची भीती असतानाही गर्दीतून खरेदी सुरू होती.

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, ११ वाजेनंतरही अनेक ठिकाणी विक्री सुरू होती. दुकानदार चार ग्राहकांना आत घेऊन शटर लावून किराणा विक्री करीत होते. त्यामुळे दिवसभर किराणा विक्री सुरू होती. आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला, फळे ग्राहकांनी खरेदी केल्यामुळे भाजी विक्रेत्यांकडील भाजीचीही हातोहात विक्री झाली. कांदा-बटाटा-लसूण विक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेतला. दुचाकीवरून अनेक ग्राहक कांद्याचे पोते घरी घेऊन जात होते. प्रशासनाने दूध घरपोच विक्री करण्याची सूचना केली आहे. मात्र, तरीही मंगळवारी सकाळी दुधासाठी विशेष मागणी होती. अनेक ग्राहकांनी जास्त दूध, दही खरेदी केले.

-------------------

आक्षेपानंतर एक दिवस उशिराने लाॅकडाऊन

जिल्हा प्रशासनाने साेमवारी लाॅकडाऊन जाहीर करताच रत्नागिरी शहरातील व्यापारी महासंघाने त्याला विराेध केला. अर्धवट लाॅकडाऊन करण्याऐवजी पूर्ण लाॅकडाऊन करा, असा सूर आळवला. त्यानंतर मंगळवारी जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतर २ जूनऐवजी ३ जूनपासून लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

----------------------------

कारवाई टाळली

बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांसाठी बॅंकांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील वाहनांची वर्दळ सुरूच होती. वास्तविक लाॅकडाऊन सुरूच असल्याने शहराच्या प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मात्र, कडक लाॅकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय होऊन नये यासाठी पोलिसांनी विशेष कारवाई टाळली.