शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

नागरिक बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

रत्नागिरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र ...

रत्नागिरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून या आव्हानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या अधिकच वाढू लागली आहे.

बाल संरक्षण प्रशिक्षण

लांजा : रत्नागिरी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील शिपोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी लांजा तालुका बालसंरक्षण अधिकारी कांबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका माळी आदींनी मार्गदर्शन केले.

अपघातांचे प्रमाण वाढले

देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुन्हा थांबले आहे. मात्र काम सुरू असलेल्या भागात ठेकेदाराने सूचनांचा फलक लावलेला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर फलक न उभारल्याने अपघातांची संख्या वाढु लागली आहे.

श्वानदंशाचे प्रकार वाढले

रत्नागिरी : शहर तसेच उपनगरात श्वानांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान झुंडीने इतरत्र फिरत असतात. काही वेळा दुचाकीस्वारांच्या अंगावरही धावून जात हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी श्वानांकडून लहान मुलांवर दंश होण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संस्कृत संभाषण वर्ग

चिपळूण : येथील संस्कृत भारती कोकण प्रांताच्यावतीने शहरातील डीबीजे महाविद्यालयात ८ ते १८ एप्रिल या कालावधीत तालुकास्तरीय संस्कृत संभाषण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. ९ ते १८ एप्रिलदरम्यान बापट आळी येथील माधवबाग येथे हा वर्ग होणार आहे.

गतिरोधकाची मागणी

देवरुख : शहरातील ग्रामीण रुग्णालय चौकात चार रस्ते एकत्र आले आहेत. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, बसस्थानक आणि बाजारपेठ अशा महत्त्वाच्या चारही कार्यालयांकडून येणा-या या मार्गावर सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या चौकात गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

डांबरीकरणाचे भूमिपूजन

दापोली : जालगाव, गव्हे रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते नुकतेच झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्ता डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्णत्वाला गेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान पसरले आहे.

कांद्यांची आवक वाढली

रत्नागिरी : शहरातील अनेक भागांमध्ये सध्या बाहेरील कांदे विक्रेते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. अनेक मार्गावर बसलेल्या या विक्रेत्यांकडून कमी दराने कांदे दिले जात असल्याने नागरिकांकडून कांदा खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. १० किलोची पोती घाऊक प्रमाणात नागरिकांकडून खरेदी केली जात आहेत.

धुळीचा संसर्ग वाढला

रत्नागिरी : सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण झाली आहे. या धुळीमुळे घशाचे तसेच डोळ्यांचे विकार वाढले आहेत. या धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रस्ता दुरुस्ती कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाणीटंचाई वाढली

खेड : तालुक्यातील दुर्गम भागात आता सार्वजनिक विहिरी आटल्या आहेत. तसेच पाण्याचे अन्य स्रोतही आटू लागले आहेत. एप्रिल महिना सुरू झाल्याने आता अनेक गावांमध्ये पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करीत पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.