शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘स्वच्छ भारत स्वच्छ शाळा’ अभियानात सीआयएसएफ जवानही सरसावले

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे.

असगोली : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ उपक्रमांतर्गत आरजीपीपीएल येथील सीआयएसएफच्या जवानांनी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, अंजनवेल नं. २ कातळवाडी येथे जाऊन परिसर स्वच्छ करुन एक नवा आदर्श घालून दिला.शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रभावी जाणीव व्हावी, त्यातून घर, शाळा परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य अशा पद्धतीने देश स्वच्छतेतून समृद्ध बनावा. याकामी प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे. आरजीपीपीएल, सीआयएसएफ युनिटचे उपकमांडंट महेश पोडवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक कमांडंट सुनील गोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांच्या पथकाने अंजनवेल नं. २ शाळेचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी स्वत: बनवलेल्या पाना-फुलांच्या पुष्पगुच्छांनी जवानांचे स्वागत करुन भारतीयांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छताविषयक जाणीव जागृती व महत्व पटवून देण्यात आले.या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अवधूत राऊतराव, उपशिक्षिका सुलक्षणा करडे - राशिनकर, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे सहाय्यक कमांडंट गोयर यांनी सांगितले. त्यावेळी सीआयएसएफचे निरीक्षक राजीव शर्मा, रामनारायण प्रसाद गुप्ता, राकेश राजवाल व अन्य सीआयएसएफ आरजीपीपीएल युनिटचे अधिकारी व जवान उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील अंजनवेल - कातळवाडी शाळेत राबविण्यात आलेल्या जवानांच्या उपक्रमाबद्दल त्या परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)