शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत स्वच्छ शाळा’ अभियानात सीआयएसएफ जवानही सरसावले

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे.

असगोली : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ उपक्रमांतर्गत आरजीपीपीएल येथील सीआयएसएफच्या जवानांनी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, अंजनवेल नं. २ कातळवाडी येथे जाऊन परिसर स्वच्छ करुन एक नवा आदर्श घालून दिला.शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रभावी जाणीव व्हावी, त्यातून घर, शाळा परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य अशा पद्धतीने देश स्वच्छतेतून समृद्ध बनावा. याकामी प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे. आरजीपीपीएल, सीआयएसएफ युनिटचे उपकमांडंट महेश पोडवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक कमांडंट सुनील गोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांच्या पथकाने अंजनवेल नं. २ शाळेचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी स्वत: बनवलेल्या पाना-फुलांच्या पुष्पगुच्छांनी जवानांचे स्वागत करुन भारतीयांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छताविषयक जाणीव जागृती व महत्व पटवून देण्यात आले.या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अवधूत राऊतराव, उपशिक्षिका सुलक्षणा करडे - राशिनकर, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे सहाय्यक कमांडंट गोयर यांनी सांगितले. त्यावेळी सीआयएसएफचे निरीक्षक राजीव शर्मा, रामनारायण प्रसाद गुप्ता, राकेश राजवाल व अन्य सीआयएसएफ आरजीपीपीएल युनिटचे अधिकारी व जवान उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील अंजनवेल - कातळवाडी शाळेत राबविण्यात आलेल्या जवानांच्या उपक्रमाबद्दल त्या परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)