शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणकरांना आणखी एका मल्टिस्टेट कंपनीकडून कोट्यवधीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

चिपळूण : ठाणे येथे स्थापन झालेल्या एका मल्टिस्टेट कंपनीने चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे ...

चिपळूण : ठाणे येथे स्थापन झालेल्या एका मल्टिस्टेट कंपनीने चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी कालिकाई संपर्क सेवा समितीने याबाबत थेट आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत चालढकल होत असल्याने समितीने आता थेट गृहमंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

कालिकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चिपळूण तालुक्यात प्रथम कालिकाई इंडिया (ई) लिमिटेड ही संस्था स्थापन करण्यात आली. नंतर याच संस्थेला चक्क राष्ट्रीय दर्जा देण्याच्या नावाखाली २०१४ साली संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो.अशी राष्ट्रीयकृत नोंदणी करण्यात आली. त्यानंतर नव्या योजनेने कामकाज सुरू करण्यात आले. राष्ट्रीयकृत आणि शेतीविषयक संस्था असल्याने गुंतवणूकदारांनी मोठी पसंती या मल्टिस्टेट कंपनीला दिली. चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो जणांनी या कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीचा कारभार मुंबईतील वडाळा येथील कार्यालयातून सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना पैसे मिळाले. नंतर मात्र अनेक मल्टिस्टेट कंपन्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली. गुंतवणूकदारांचे पैसे देता येत नसल्याने संचालक मंडळाने चालढकल सुरू केली, अशी माहितीही राजेश सावंत यांनी दिली आहे.

हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद शिरीशकर यांच्या अध्यक्षतेखाली कालिकाई संपर्क सेवा समिती या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने १० जून २०२१ रोजी तक्रार दाखल केली असून, संबंधित संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण माटुंगा येथील पोलीस उपायुक्तांकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

--------------------------

कोकणातील मोठी फसवणूक

या मल्टिस्टेट कंपनीचे सुमारे १ लाखाहून अधिक सभासद असून, किमान १०० ते १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चिपळूण, रत्नागिरी, मुंबई अशा कोकणपट्ट्यातील लोकांनी ही गुंतवणूक असून, कोकणातील लोकांची ही सर्वांत मोठी फसवणूक ठरणार आहे. त्यामुळे कालिकाई संपर्क सेवा समिती शेवटपर्यंत लढा लढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे राजेश सावंत यांनी म्हटले आहे.