शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

चिपळूणकरांना आणखी एका मल्टिस्टेट कंपनीकडून कोट्यवधीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

चिपळूण : ठाणे येथे स्थापन झालेल्या एका मल्टिस्टेट कंपनीने चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे ...

चिपळूण : ठाणे येथे स्थापन झालेल्या एका मल्टिस्टेट कंपनीने चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी कालिकाई संपर्क सेवा समितीने याबाबत थेट आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत चालढकल होत असल्याने समितीने आता थेट गृहमंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

कालिकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चिपळूण तालुक्यात प्रथम कालिकाई इंडिया (ई) लिमिटेड ही संस्था स्थापन करण्यात आली. नंतर याच संस्थेला चक्क राष्ट्रीय दर्जा देण्याच्या नावाखाली २०१४ साली संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो.अशी राष्ट्रीयकृत नोंदणी करण्यात आली. त्यानंतर नव्या योजनेने कामकाज सुरू करण्यात आले. राष्ट्रीयकृत आणि शेतीविषयक संस्था असल्याने गुंतवणूकदारांनी मोठी पसंती या मल्टिस्टेट कंपनीला दिली. चिपळूण, रत्नागिरीसह मुंबईपर्यंत हजारो जणांनी या कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीचा कारभार मुंबईतील वडाळा येथील कार्यालयातून सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना पैसे मिळाले. नंतर मात्र अनेक मल्टिस्टेट कंपन्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली. गुंतवणूकदारांचे पैसे देता येत नसल्याने संचालक मंडळाने चालढकल सुरू केली, अशी माहितीही राजेश सावंत यांनी दिली आहे.

हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद शिरीशकर यांच्या अध्यक्षतेखाली कालिकाई संपर्क सेवा समिती या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने १० जून २०२१ रोजी तक्रार दाखल केली असून, संबंधित संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण माटुंगा येथील पोलीस उपायुक्तांकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

--------------------------

कोकणातील मोठी फसवणूक

या मल्टिस्टेट कंपनीचे सुमारे १ लाखाहून अधिक सभासद असून, किमान १०० ते १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चिपळूण, रत्नागिरी, मुंबई अशा कोकणपट्ट्यातील लोकांनी ही गुंतवणूक असून, कोकणातील लोकांची ही सर्वांत मोठी फसवणूक ठरणार आहे. त्यामुळे कालिकाई संपर्क सेवा समिती शेवटपर्यंत लढा लढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे राजेश सावंत यांनी म्हटले आहे.