शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चिपळुणात वाशिष्ठी, शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

चिपळूण : शहरासह तालुक्यात बुधवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीला पूर आला. रात्री तीनच्या सुमारास शहरातील बाजारपेठेसह विविध भागात ...

चिपळूण : शहरासह तालुक्यात बुधवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीला पूर आला. रात्री तीनच्या सुमारास शहरातील बाजारपेठेसह विविध भागात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पहाटे पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुराचे पाणी ओसरले. पूरस्थितीमुळे गणेश विसर्जन घाटाशेजारील सहा कुटुंबांना शेजारच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले हाेते. पावसाचा जाेर वाढल्याने मुख्याधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे परिस्थितीची पाहणी केली.

काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टीने हुलकावणी दिली होती. त्यानंतर बुधवारी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला होता. त्यामुळे वाशिष्ठी आणि शिवनदीतील पाण्याची पातळी वाढली होती. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री तीनच्या सुमारास नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत होते. रात्री तीनच्या सुमारास वाशिष्ठी नदीची पातळी ५.३० मीटर इतकी होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे हे रात्री तीनच्या सुमारास बहादूरशेखला वाशिष्ठी नदीकाठी पोहोचले. तिथे पाण्याची पातळी पाहिल्यानंतर ते बाजारपुलाकडे आले. त्यावेळी पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्यामुळे पुलाचे दोन्ही मार्ग बंद झाले होते. नदी पातळीत वाढ झाल्याने गणेश विसर्जन घाटाशेजारील ६ कुटुंबांना रात्रीच शेजारच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. पुराच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा आपत्कालिन कक्षही सज्ज झाला होता.

दरम्यान, पहाटेच्या सुमारास चिंचनाका, वडनाका, लोटिस्मा वाचनालय, अनंत आईस फॅक्टरी, मुरादपूर, शंकरवाडी, भेंडीनाका, पेठमाप येथे पुराचे पाणी भरले होते. सुमारे दीड तास पुराचे पाणी शहरात भरले होते. त्यानंतर पूर ओसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, मुसळधार पावसात तालुक्यातील आकले - तिवरे मार्गावर दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड जेसीबीच्या सहाय्याने दूर केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. तसेच टेरव येथील लिंगेश्वर मंदिराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात १९७.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर तालुक्यात एकूण पाऊस हा ६९४.२५ मिलिमीटर इतका झाला आहे.