शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या वेळा बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात वाढ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांना परीक्षा देताना त्रास हाेण्याची शक्यता अधिक आहे. वाढत्या तापमानाचा विचार करून दहावी, बारावीच्या परीक्षांच्या वेळेत बदल करून त्या सकाळ सत्रात घ्याव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दहावी व बारावीच्या परीक्षा अनुक्रमे २९ एप्रिल व २३ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यांत होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यांत कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणांचे तापमान ४० अंशांपेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलण्याबाबत शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री गायकवाड यांना पत्र दिल्याची माहिती शिक्षक भारती उर्दूचे प्रमुख कार्यवाह मुबीन बामणे यांनी दिली आहे.

कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागांतील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी आठ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती या पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे.