शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

नवनियुक्त वनपालांसमाेर वनसंरक्षणाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य लाेकमत न्यूज नेटवर्क प्रशांत सुर्वे मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची ...

वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य

लाेकमत न्यूज नेटवर्क

प्रशांत सुर्वे

मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची कत्तल पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. अतिवृष्टी, दरडी कोसळणे, वातावरणातील बदल, मोसमांची अनियमितता यांना कारणीभूत ठरलेल्या जंगलतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत आहे. मंडणगड तालुका तर जंगलतोडीचा माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. तालुक्यातील नवनियुक्त वनपाल अनिल दळवी यांच्यासमोर आता वनसंवर्धनाचे आव्हान आहे.

अतिवृष्टीत म्हाप्रळ-भोर-पंढरपूर या राज्यमार्गावर पुणे जिल्हा हद्दीत २४ तासांत जवळपास ३० ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे रस्ते बाधित झाले, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. माेठ्या प्रमाणात हाेणारी वृक्षताेड याला कारणीभूत ठरत आहे. कोकण भाग हा सह्याद्रीच्या गर्द आणि हिरव्यागार जंगल भागासाठी प्रसिद्ध आहे, अनेक पर्यटन क्षेत्र पर्यटकांना खुणावतात. मग सरकारी पातळीवर कोकणासाठी पर्यटनदृष्ट्या गोवा राज्य धरतीवर पर्यटन विभाग म्हणून जाहीर करून विविध योजनांच्या माध्यमातून चालना देणे गरजेचे आहे, त्याद्वारे येथील नागरिकांसाठी पर्यटनातून रोजगारनिर्मिती होऊ शकते, येथील कोकणी माणसाला येथील नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर कोकणी शैली जगासमोर मांडता येऊ शकते. मात्र, गेल्या काही वर्षात माेठ्या प्रमाणात वृक्षांची ताेड करून डाेंगर उजाड केले जात आहेत.

काेकणाला निसर्गतः वृक्षांची साधनसंपत्ती मिळाली आहे, असे असताना मूठभर लोकांच्या व्यवसायाकरिता जंगलांची कत्तल करून भविष्य काय? कायद्यातील पळवाटा तयार करून जंगलतोडीला प्राधान्य देणे अयोग्यच, किंबहुना किटा व्यवसाय येथील प्रथम क्रमाकांचा व्यवसाय बनला आहे. वृक्षताेडीमुळे सह्याद्रीच्या कुशीतील मंडणगड तालुक्याची ओळख भविष्यात ओसाड सह्याद्री म्हणून होण्यास वेळ लागणार नाही. मागील दोन वर्षात तालुक्यावर ओढवलेल्या निसर्ग आणि ताैक्ते अशा दोन चक्रीवादळांच्या संकटानंतर तालुक्यात झालेल्या बागायती व जंगली वृक्षांचे नुकसान न भरून येणारे आहे. त्यानंतर वनविभाग, कृषी विभाग यांनी किती रोपांची नव्याने लागवड केली हा संशाेधनाचा विषय आहे. तालुक्यातील वनसंवर्धन करण्यासाठी वनपालांनी वनरक्षणाची मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक कार्यक्रमाची आखणी करणे गरजेचे आहे. नवनियुक्त झालेले वनपाल अनिल दळवी यांच्यासमाेर आता वृक्षताेड राेखण्याचे खरे आव्हान आहे.

---

तत्कालीन राज्य सरकारची दरवर्षी राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवडीची योजना होती. कोरोनात त्यात खंड पडला. तत्कालीन पाच वर्षांच्या कालखंडात मंडणगड तालुक्यात हजारो रोपांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यातील किती रोपांचे संवर्धन झाले आहे, याचा शाेध घ्यावा लागेल. लागवड केलेल्या रोपांचे ऑडिट वनविभागाने करणे गरजेचे आहे. दरम्यान, याच कालावधीत रोपांच्या लागवडीखाली आलेले क्षेत्र व वृक्षांचे तोड केलेले क्षेत्र याचा सरासरी ठोकताळा वनविभागाने जाहीर करावा, तोड झालेले क्षेत्र लागवडीपेक्षा तोडीचे क्षेत्र चार ते पाच पट अधिक असण्याची शक्यता आहे.