शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

नवनियुक्त वनपालांसमाेर वनसंरक्षणाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य लाेकमत न्यूज नेटवर्क प्रशांत सुर्वे मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची ...

वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य

लाेकमत न्यूज नेटवर्क

प्रशांत सुर्वे

मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची कत्तल पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. अतिवृष्टी, दरडी कोसळणे, वातावरणातील बदल, मोसमांची अनियमितता यांना कारणीभूत ठरलेल्या जंगलतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत आहे. मंडणगड तालुका तर जंगलतोडीचा माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. तालुक्यातील नवनियुक्त वनपाल अनिल दळवी यांच्यासमोर आता वनसंवर्धनाचे आव्हान आहे.

अतिवृष्टीत म्हाप्रळ-भोर-पंढरपूर या राज्यमार्गावर पुणे जिल्हा हद्दीत २४ तासांत जवळपास ३० ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे रस्ते बाधित झाले, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. माेठ्या प्रमाणात हाेणारी वृक्षताेड याला कारणीभूत ठरत आहे. कोकण भाग हा सह्याद्रीच्या गर्द आणि हिरव्यागार जंगल भागासाठी प्रसिद्ध आहे, अनेक पर्यटन क्षेत्र पर्यटकांना खुणावतात. मग सरकारी पातळीवर कोकणासाठी पर्यटनदृष्ट्या गोवा राज्य धरतीवर पर्यटन विभाग म्हणून जाहीर करून विविध योजनांच्या माध्यमातून चालना देणे गरजेचे आहे, त्याद्वारे येथील नागरिकांसाठी पर्यटनातून रोजगारनिर्मिती होऊ शकते, येथील कोकणी माणसाला येथील नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर कोकणी शैली जगासमोर मांडता येऊ शकते. मात्र, गेल्या काही वर्षात माेठ्या प्रमाणात वृक्षांची ताेड करून डाेंगर उजाड केले जात आहेत.

काेकणाला निसर्गतः वृक्षांची साधनसंपत्ती मिळाली आहे, असे असताना मूठभर लोकांच्या व्यवसायाकरिता जंगलांची कत्तल करून भविष्य काय? कायद्यातील पळवाटा तयार करून जंगलतोडीला प्राधान्य देणे अयोग्यच, किंबहुना किटा व्यवसाय येथील प्रथम क्रमाकांचा व्यवसाय बनला आहे. वृक्षताेडीमुळे सह्याद्रीच्या कुशीतील मंडणगड तालुक्याची ओळख भविष्यात ओसाड सह्याद्री म्हणून होण्यास वेळ लागणार नाही. मागील दोन वर्षात तालुक्यावर ओढवलेल्या निसर्ग आणि ताैक्ते अशा दोन चक्रीवादळांच्या संकटानंतर तालुक्यात झालेल्या बागायती व जंगली वृक्षांचे नुकसान न भरून येणारे आहे. त्यानंतर वनविभाग, कृषी विभाग यांनी किती रोपांची नव्याने लागवड केली हा संशाेधनाचा विषय आहे. तालुक्यातील वनसंवर्धन करण्यासाठी वनपालांनी वनरक्षणाची मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक कार्यक्रमाची आखणी करणे गरजेचे आहे. नवनियुक्त झालेले वनपाल अनिल दळवी यांच्यासमाेर आता वृक्षताेड राेखण्याचे खरे आव्हान आहे.

---

तत्कालीन राज्य सरकारची दरवर्षी राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवडीची योजना होती. कोरोनात त्यात खंड पडला. तत्कालीन पाच वर्षांच्या कालखंडात मंडणगड तालुक्यात हजारो रोपांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यातील किती रोपांचे संवर्धन झाले आहे, याचा शाेध घ्यावा लागेल. लागवड केलेल्या रोपांचे ऑडिट वनविभागाने करणे गरजेचे आहे. दरम्यान, याच कालावधीत रोपांच्या लागवडीखाली आलेले क्षेत्र व वृक्षांचे तोड केलेले क्षेत्र याचा सरासरी ठोकताळा वनविभागाने जाहीर करावा, तोड झालेले क्षेत्र लागवडीपेक्षा तोडीचे क्षेत्र चार ते पाच पट अधिक असण्याची शक्यता आहे.