शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त वनपालांसमाेर वनसंरक्षणाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य लाेकमत न्यूज नेटवर्क प्रशांत सुर्वे मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची ...

वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य

लाेकमत न्यूज नेटवर्क

प्रशांत सुर्वे

मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची कत्तल पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. अतिवृष्टी, दरडी कोसळणे, वातावरणातील बदल, मोसमांची अनियमितता यांना कारणीभूत ठरलेल्या जंगलतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत आहे. मंडणगड तालुका तर जंगलतोडीचा माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. तालुक्यातील नवनियुक्त वनपाल अनिल दळवी यांच्यासमोर आता वनसंवर्धनाचे आव्हान आहे.

अतिवृष्टीत म्हाप्रळ-भोर-पंढरपूर या राज्यमार्गावर पुणे जिल्हा हद्दीत २४ तासांत जवळपास ३० ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे रस्ते बाधित झाले, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. माेठ्या प्रमाणात हाेणारी वृक्षताेड याला कारणीभूत ठरत आहे. कोकण भाग हा सह्याद्रीच्या गर्द आणि हिरव्यागार जंगल भागासाठी प्रसिद्ध आहे, अनेक पर्यटन क्षेत्र पर्यटकांना खुणावतात. मग सरकारी पातळीवर कोकणासाठी पर्यटनदृष्ट्या गोवा राज्य धरतीवर पर्यटन विभाग म्हणून जाहीर करून विविध योजनांच्या माध्यमातून चालना देणे गरजेचे आहे, त्याद्वारे येथील नागरिकांसाठी पर्यटनातून रोजगारनिर्मिती होऊ शकते, येथील कोकणी माणसाला येथील नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर कोकणी शैली जगासमोर मांडता येऊ शकते. मात्र, गेल्या काही वर्षात माेठ्या प्रमाणात वृक्षांची ताेड करून डाेंगर उजाड केले जात आहेत.

काेकणाला निसर्गतः वृक्षांची साधनसंपत्ती मिळाली आहे, असे असताना मूठभर लोकांच्या व्यवसायाकरिता जंगलांची कत्तल करून भविष्य काय? कायद्यातील पळवाटा तयार करून जंगलतोडीला प्राधान्य देणे अयोग्यच, किंबहुना किटा व्यवसाय येथील प्रथम क्रमाकांचा व्यवसाय बनला आहे. वृक्षताेडीमुळे सह्याद्रीच्या कुशीतील मंडणगड तालुक्याची ओळख भविष्यात ओसाड सह्याद्री म्हणून होण्यास वेळ लागणार नाही. मागील दोन वर्षात तालुक्यावर ओढवलेल्या निसर्ग आणि ताैक्ते अशा दोन चक्रीवादळांच्या संकटानंतर तालुक्यात झालेल्या बागायती व जंगली वृक्षांचे नुकसान न भरून येणारे आहे. त्यानंतर वनविभाग, कृषी विभाग यांनी किती रोपांची नव्याने लागवड केली हा संशाेधनाचा विषय आहे. तालुक्यातील वनसंवर्धन करण्यासाठी वनपालांनी वनरक्षणाची मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक कार्यक्रमाची आखणी करणे गरजेचे आहे. नवनियुक्त झालेले वनपाल अनिल दळवी यांच्यासमाेर आता वृक्षताेड राेखण्याचे खरे आव्हान आहे.

---

तत्कालीन राज्य सरकारची दरवर्षी राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवडीची योजना होती. कोरोनात त्यात खंड पडला. तत्कालीन पाच वर्षांच्या कालखंडात मंडणगड तालुक्यात हजारो रोपांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यातील किती रोपांचे संवर्धन झाले आहे, याचा शाेध घ्यावा लागेल. लागवड केलेल्या रोपांचे ऑडिट वनविभागाने करणे गरजेचे आहे. दरम्यान, याच कालावधीत रोपांच्या लागवडीखाली आलेले क्षेत्र व वृक्षांचे तोड केलेले क्षेत्र याचा सरासरी ठोकताळा वनविभागाने जाहीर करावा, तोड झालेले क्षेत्र लागवडीपेक्षा तोडीचे क्षेत्र चार ते पाच पट अधिक असण्याची शक्यता आहे.