शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

राजापुरातील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने रविवारी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना या पथकाने भेट दिली. ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने रविवारी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना या पथकाने भेट दिली. या पथकाने तौक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत व त्यानंतर राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे तसेच सर्वच विभागांच्या प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले.

अशोककुमार परमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आले होते. त्यांच्यासोबत समन्वयक म्हणून विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती कोकण विभागाचे महसूल उपायुक्त मकरंद देशमुख यांनी केली होती. केंद्र शासनाचे हे पथक कोकणातील पाच जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे. रविवारी सकाळी या पथकाने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे महावितरणच्या झालेल्या वीजखांब व अन्य नुकसानाची तसेच दुधवडकर यांच्या नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. त्यानंतर तुळसुंदे-होळी येथील खडपे यांच्या घराची तसेच त्यानंतर कुवेशी येथील ताम्हणकर यांच्या सुपारी बागेच्या झालेल्या नुकसानाची पाहणी या पथकाने केली. कुवेशी येथून हे पथक कुणकेश्वर येथे रवाना झाले.

या पथकामध्ये अशोककुमार परमार, अभयकुमार, दीपक गवळी, आर. पी. सिंघ, देवेंद्र चाफेकर, अशोक कदम तसेच समन्वयक म्हणून ठाणे येथील रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, मुंबई तहसीलदार अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार प्रशांत सावंत, तहसीलदार वीरसिंग वसावे, भांडुपचे तहसीलदार रेवण लेंभे, घाटकोपरचे तहसीलदार अविनाश कोष्टी आदी उपस्थित होते.