शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

राजापुरातील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने रविवारी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना या पथकाने भेट दिली. ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने रविवारी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना या पथकाने भेट दिली. या पथकाने तौक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत व त्यानंतर राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे तसेच सर्वच विभागांच्या प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले.

अशोककुमार परमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आले होते. त्यांच्यासोबत समन्वयक म्हणून विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती कोकण विभागाचे महसूल उपायुक्त मकरंद देशमुख यांनी केली होती. केंद्र शासनाचे हे पथक कोकणातील पाच जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे. रविवारी सकाळी या पथकाने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे महावितरणच्या झालेल्या वीजखांब व अन्य नुकसानाची तसेच दुधवडकर यांच्या नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. त्यानंतर तुळसुंदे-होळी येथील खडपे यांच्या घराची तसेच त्यानंतर कुवेशी येथील ताम्हणकर यांच्या सुपारी बागेच्या झालेल्या नुकसानाची पाहणी या पथकाने केली. कुवेशी येथून हे पथक कुणकेश्वर येथे रवाना झाले.

या पथकामध्ये अशोककुमार परमार, अभयकुमार, दीपक गवळी, आर. पी. सिंघ, देवेंद्र चाफेकर, अशोक कदम तसेच समन्वयक म्हणून ठाणे येथील रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, मुंबई तहसीलदार अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार प्रशांत सावंत, तहसीलदार वीरसिंग वसावे, भांडुपचे तहसीलदार रेवण लेंभे, घाटकोपरचे तहसीलदार अविनाश कोष्टी आदी उपस्थित होते.