शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काजूला कोकणात यंदा मिळतोय समाधानकारक दर

By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST

दरात वाढ : पंचवीस वर्षांपूर्वीचा दर आता समाधानकारक स्थितीत, गावपातळीवर होतेय मोठी उलाढाल

जाकादेवी : जाकादेवी परिसरात काजूबीचा दर वधारला असल्याचे चित्र आहे. यावर्षीचे आंबा, काजूचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. कमी उत्पादनामुळे बाजारात सुक्या काजूबीला ८० ते ९० रुपये किलोला दर मिळत आहे.सुमारे २५ वर्षांपूर्वी हा दर २.५० पैसे असा होता, असेही एका व्यावसायिकाने सांगितले. छोटे मोठे व्यावसायिक ८० ते ९० रुपये किलोने काजूबी घेऊन ९५ रुपये किलो दराने फॅक्टरीत घालतात. जाकादेवी परिसरात काजूबी खरेदीचे ८ ते ९ काटे आहेत. या काट्यांवर परिसरातील किरकोळ काजूबी विक्रेते बाजारपेठेत काजू घालायला पिशवी किंवा गोणता भरुन घेऊन जातात व विक्री करतात. छोटे -मोठे काजूबी खरेदी करणारे व्यावसायिक वाडीवस्त्यांवर फिरून काजूबी खरेदी करताना दिसतात. प्रत्यक्ष बागेत जाऊनही काजूबी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्याचा हेलपाटा वाचतो. फिरत्या खरेदी व्यावसायिकांमध्ये स्थानिक व्यावसायिकांसह परप्रांतीय व्यावसायिकसुद्धा आहेत. जाताना ही मंडळी बेकरीचे पदार्थ खारी-बटर-टोस्ट घेऊन जातात. त्याच्या मोबदल्यात काजूबी खरेदी करुन आणतात. काही ठिकाणी बागेचे टेंडर काढून काजूबी खरेदी करण्याची पद्धत अवलंबिली जाते. ५० ते १०० पोती बियांचे टेंडर असते. खासगी कंपनी आणि खासगी वाहतुकीचा मालक हे टेंडर घेतात. जाकादेवी बाजारपेठ व आजूबाजूला ८ ते ९ काटे आहेत. हे वजन काटे ३ ते ५ किलोचे, तर १०० किलोचा स्प्रिंगचा ताण काटाही असतो. आज या काट्याची बाजार किंमत छोटे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत असतो. याला हात काटा म्हणतात, तर मोठ्या काट्याची किंमत १२०० ते १५०० रुपयांपर्यंत असते.जाकादेवी येथे काजूबी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय ३० वर्षापूर्वीपासून रंजना वाडकर करतात. त्यांनी खूप वर्षापूर्वी २.५० पैसे दराने काजू बी खरेदीचा व्यवसाय सुरु केला. परिसरातील काजू बी व्यावसायिक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर लाखन वाडकर हे ही या व्यवसायात चांगला जम बसवून आहेत. छोट्या व्यवसायात महेश साळुंखे व बंधूचे नाव घेतले जाते.गेले दोन वर्षापासून जाकादेवी बाजारपेठेत स्वराज्य कॅश्यू नावाची मुकेश देसाई यांची काजू फॅक्टरी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्यांचाही काजू बी खरेदीचा स्टॉल बाजारपेठेत आहे. धामणसे मासेबाव येथेही काजू फॅक्टरी आहेत. काजू प्रक्रिया मशीन दीड लाखापर्यंत किंमतीची आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरलेली मशीन ५ लाखापर्यंत आहे असे सांगितले जाते.हे मशीन काजू प्रक्रियेसाठी १२ तास दिवसा किंवा रात्रभर सुरु ठेवले तर ५०० ते ६०० रुपये लाईट बिल येते, अशीही माहिती मिळाली. फॅक्टरीत सोलला गेलेलाही काजू ४ किलो बियातून १ किलो काजूगर देतो. यामध्ये चार प्रकार असून, खारा, मसाला, तुकडा आणि व्हाईट हे प्रकार असतात. आज बाजारात ६०० ते ७०० रुपये किलो दर आहे. फिरते छोटे व्यापारी बी खरेदी करुन आणताना दिसतात. रस्त्याची सोय असेल तेथे मोटरसायकल, अ‍ॅम्पो किंवा रिक्षातून पोती आणताना दिसतात. परप्रांतीय मंडळी एका दगडात दोन पक्षी मारतात, तसे काम करतात. बेकरी प्रॉडक्ट विकायचे येताना काजूबी घेऊन यायचे. अतिशय मेहनती असलेले हे लोक या व्यवसायात जम बसवून आहेत. हंगामातील या उत्पन्नाकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. (वार्ताहर)व्यावसायिकांची धावपळकाजू बीचा हा व्यवसाय हंगामी असून मार्च-एप्रिल असे दोन महिनेच काजू बीची खरेदी-विक्री चालते. हे व्यावसायिक हंगामात काजू बी खरेदी करतात. त्यांचा साठा करतात व दर बघून आॅड सिझनला काजू बी विकतात. या व्यवसायातून छोट्या व्यावसायिकांना ५० ते ६० हजार रु. तर मोठ्या व्यावसायिकांना दीड ते दोन लाख रुपयेही मिळून जातात असे काहीजणांकडून सांगण्यात आले.