शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खोटे दाखलेप्रकरणी दोघांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: December 7, 2015 00:18 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

रहिम दलाल-- रत्नागिरी--आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांची वेतनवाढ रोखली, तर अन्य पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. खोट्या पदवीप्रकरणानंतर थंड होऊ लागलेल्या जिल्हा परिषदेत आता आंतरजिल्हा बदलीसाठी खोट्या दाखल्यांचे प्रकरण गाजू लागले आहे. हा प्रश्न सध्या जिल्हा परिषद वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदाराचा दाखला खोटा जोडण्यात आल्याचे सांगली जिल्हा परिषदेने उघडकीस आणले होते. त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे सात शिक्षक असल्याचे पुढे आले होते. त्यामध्ये शिक्षक - शिवाजी कोयनाप्पा करवर, चंद्रकांत दत्तात्रय कोरबू, रेवाप्पा सर्जेराव खोत, शिक्षिका - कविता दत्तात्रय आंबी, सुशिला सुर्याबा सलगर, आरती वसंत चव्हाण व आशाताई तानाजी मंडळे यांचा समावेश आहे.खोटे दाखले जोडून या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचा उघडकीस आला. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार यांनी दखल घेतली होती. त्यानंतर त्या शिक्षकांवर त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याबाबत त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे त्या सातही शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यांची खातेनिहाय चौकशी करुन मूळ कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. या झालेल्या चौकशीमध्ये शिक्षिका कविता आंबी आणि आशाताई मदने यांनी खोटी कागदपत्र जोडल्याचा गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी या दोघांंचीही वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.तसेच शिवाजी करवर, चंद्रकांत कोरबू, सुशिला सरगर, आरती चव्हाण आणि रेवाप्पा खोत या शिक्षकांनी हात वर करीत जोडलेले कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगून गुन्हा नाकबूल केला. त्यामुळे जिल्हा परिषदेने या पाचही जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ माजली आहे.मुलांना काय धडे देणार? : खोटे बोलण्यात गुरुजींचा कहरआंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडल्याचे प्रकरण सांगली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. नातेवाईक शासकीय सेवेत नसतानाही त्यांनी ते सेवेत असल्याचे दाखले जोडल्याचे नाकारून गुरुजींनी खोटे बोलण्याचा कहरच केला आहे. त्यामुळे असे सत्य बोलण्याचे मुलांना काय धडे देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.फौजदारी अद्याप नाहीमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण विभाग त्यांची मूळ कागदपत्र पोलिसांसमोर सादर करूशकलेला नाही. त्यामुळे त्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई अद्याप झालेली नाही.