शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

रामआळीत सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत चालणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहराची व्यापारीपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळीत सर्वाधिक गर्दी होते आणि तेथेच पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच गायब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहराची व्यापारीपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळीत सर्वाधिक गर्दी होते आणि तेथेच पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच गायब आहेत. काही ठिकाणी व्यापारी आपल्या दुकानातील माल तेथे मांडत आहेत, तर काही दुकानदार त्यावर दुचाकी लावून ठेवत आहेत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून पादचारी, ग्राहकांना सामानाच्या पिशव्या सांभाळत मार्ग काढणे अवघड झाले आहे.

नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतर्फे लाॅकडाऊनपूर्वी अतिक्रमणे हटवून मार्ग, फूटपाथ मोकळे करण्यात आले होते. अनलाॅकमध्ये हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. रामआळीतून गोखलेनाका, धनजीनाका भागात खरेदीसाठी जाता येत असल्याने ग्राहकांची सतत रहदारी सुरू असते. शिवाय चार वाजेपर्यंतच बाजारपेठ खुली असल्याने दुपारी गर्दी बऱ्यापैकी होते. वाहनचालकही वाहने घेऊन रामआळीमार्गे गोखलेनाका, विठ्ठलमंदिर, गाडीतळ, धनजीनाका परिसरात जात असल्याने वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना ये-जा करणे अशक्य होत आहे. फळे, सुकामेवा, चप्पल, अन्य छोट्यामोठ्या वस्तूविक्रेते रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटत असल्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे.

रामआळीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना वाहनांची गर्दी तसेच छोट्या मोठ्या वस्तू विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानामुळे होणाऱ्या गर्दीतून मार्ग काढणे अवघड बनले आहे.

हजारो लाेकांची ये-जा

किराणा, कपडे, चप्पल, भांडी, मिठाई, औषधे, फळे याशिवाय अन्य विविध प्रकारच्या वस्तूंंची खरेदीसह बॅंका, दवाखाने, सरकारी कामानिमित्त शहरात आलेले लोक रामआळीतून ये-जा करतात. दिवसाला पादचाऱ्यासह वाहनचालक मिळून हजारो या मार्गावरून ये-जा करतात. खोदकाम केल्याने रस्ते निकृष्ट झाले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावत असल्याने गर्दीत भर पडत आहे.

फूटपाथ कागदावरच

रामआळीमध्ये फूटपाथ गायब असून काही ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे. काही ठिकाणी दुकानांचा माल मांडला जात आहे, तर काही ठिकाणी दुचाकी लावून ठेवण्यात येत असल्याने पादचारी, ग्राहकांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. सणासुदीवेळी तर खरेदीसाठी होणारी गर्दी यामुळे लहान मुलांना घेऊन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना गर्दीतून वाट काढणे अवघड बनले आहे. फूटपाथ असून नसल्यासारखेच आहेत.

निकृष्ट रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, त्यामुळे वाहनांची लागणारी रांग, पादचारी, ग्राहकांची होणारी गर्दी, हातगाडीवाले, छोटे विक्रेते दुकाने लावत असून, अनेक दुकानदार दुकानाबाहेर पसारा वाढवत आहेत. त्यामुळे गर्दीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे.

- अंजनी पाध्ये, रत्नागिरी

रामआळी खरेदीचा केंद्रबिंदू असल्याने याठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ते मोकळे करण्यात येतात. मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे ठराविक दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे- थे’ होत आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविताना, ती कायमस्वरूपी हटविण्यासाठी कार्यवाही व्हावी.

- सुरेश शिंदे, रत्नागिरी

अतिक्रमणे वाढली

लाॅकडाऊनपूर्वी नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अनलाॅकनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा विक्रेत्यांनी दुकानांचा पसारा वाढवला आहे. छोट्या विक्रेत्यांनी हातगाडीवर तसेच फूटपाथवर दुकाने थाटली आहेत.