शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रामआळीत सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत चालणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहराची व्यापारीपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळीत सर्वाधिक गर्दी होते आणि तेथेच पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच गायब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहराची व्यापारीपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळीत सर्वाधिक गर्दी होते आणि तेथेच पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच गायब आहेत. काही ठिकाणी व्यापारी आपल्या दुकानातील माल तेथे मांडत आहेत, तर काही दुकानदार त्यावर दुचाकी लावून ठेवत आहेत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून पादचारी, ग्राहकांना सामानाच्या पिशव्या सांभाळत मार्ग काढणे अवघड झाले आहे.

नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतर्फे लाॅकडाऊनपूर्वी अतिक्रमणे हटवून मार्ग, फूटपाथ मोकळे करण्यात आले होते. अनलाॅकमध्ये हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. रामआळीतून गोखलेनाका, धनजीनाका भागात खरेदीसाठी जाता येत असल्याने ग्राहकांची सतत रहदारी सुरू असते. शिवाय चार वाजेपर्यंतच बाजारपेठ खुली असल्याने दुपारी गर्दी बऱ्यापैकी होते. वाहनचालकही वाहने घेऊन रामआळीमार्गे गोखलेनाका, विठ्ठलमंदिर, गाडीतळ, धनजीनाका परिसरात जात असल्याने वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना ये-जा करणे अशक्य होत आहे. फळे, सुकामेवा, चप्पल, अन्य छोट्यामोठ्या वस्तूविक्रेते रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटत असल्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे.

रामआळीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना वाहनांची गर्दी तसेच छोट्या मोठ्या वस्तू विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानामुळे होणाऱ्या गर्दीतून मार्ग काढणे अवघड बनले आहे.

हजारो लाेकांची ये-जा

किराणा, कपडे, चप्पल, भांडी, मिठाई, औषधे, फळे याशिवाय अन्य विविध प्रकारच्या वस्तूंंची खरेदीसह बॅंका, दवाखाने, सरकारी कामानिमित्त शहरात आलेले लोक रामआळीतून ये-जा करतात. दिवसाला पादचाऱ्यासह वाहनचालक मिळून हजारो या मार्गावरून ये-जा करतात. खोदकाम केल्याने रस्ते निकृष्ट झाले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावत असल्याने गर्दीत भर पडत आहे.

फूटपाथ कागदावरच

रामआळीमध्ये फूटपाथ गायब असून काही ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे. काही ठिकाणी दुकानांचा माल मांडला जात आहे, तर काही ठिकाणी दुचाकी लावून ठेवण्यात येत असल्याने पादचारी, ग्राहकांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. सणासुदीवेळी तर खरेदीसाठी होणारी गर्दी यामुळे लहान मुलांना घेऊन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना गर्दीतून वाट काढणे अवघड बनले आहे. फूटपाथ असून नसल्यासारखेच आहेत.

निकृष्ट रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, त्यामुळे वाहनांची लागणारी रांग, पादचारी, ग्राहकांची होणारी गर्दी, हातगाडीवाले, छोटे विक्रेते दुकाने लावत असून, अनेक दुकानदार दुकानाबाहेर पसारा वाढवत आहेत. त्यामुळे गर्दीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे.

- अंजनी पाध्ये, रत्नागिरी

रामआळी खरेदीचा केंद्रबिंदू असल्याने याठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ते मोकळे करण्यात येतात. मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे ठराविक दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे- थे’ होत आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविताना, ती कायमस्वरूपी हटविण्यासाठी कार्यवाही व्हावी.

- सुरेश शिंदे, रत्नागिरी

अतिक्रमणे वाढली

लाॅकडाऊनपूर्वी नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अनलाॅकनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा विक्रेत्यांनी दुकानांचा पसारा वाढवला आहे. छोट्या विक्रेत्यांनी हातगाडीवर तसेच फूटपाथवर दुकाने थाटली आहेत.