शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांनो... जागते रहो...!

By admin | Updated: April 24, 2016 00:35 IST

पहारा कडक : कॅनिंग सुरु झाल्याने वाढली चोरीची भीती

रत्नागिरी : आंबा कमी असतानासुध्दा कॅनिंग सुरू झाल्याने शेतकरीबांधव चिंताग्रस्त झाला आहे. कॅनिंग सुरू झाल्यानंतर चोरीचे प्रकार वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील पहारा कडक केला आहे.यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्याने हंगामापूर्वी आलेला मोहोर टिकला. शेतकऱ्यांना १५ ते १६ वेळा फवारण्या कराव्या लागल्या. प्रतिबंधात्मक कीटकनाशकांमुळे तुडतुडा नष्ट होत नाही. तुडतुड्याच्या विष्ठेमुळे आंब्यावर काळे डाग पडले आहेत. डाग पडलेल्या आंब्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे निवडक आंब्याच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा किलोवर दिल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या रोखीने पैसे मिळतात.ग्रामीण भागाबरोबर शहरातही कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ एप्रिलपासून कँनिग सुरू झाले आहे. ३० रुपये किलो दराने या आंब्याची खरेदी सुरू आहे. आंबा कमी असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्यापूर्वीच कॅनिंग सुरू झाल्याने चोरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या बागेत जागता पहारा करत असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या बागा भाडेकराराने घेऊन आंबा व्यवसाय करणारी मंडळी अधिक आहेत. प्रामुख्याने कलमबाग मालकांसोबत दोन ते तीन वर्षांसाठी करार करण्यात येतो. त्यामुळे ठरलेले पैसे मालक घेतो. याच दरम्यान झालेल्या नुकसानासाठी शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईदेखील शेतकरीच घेतो. मात्र, करार करणारा व्यापारी पीक मिळेपर्यंत खते, कीटकनाशके, मजुरी, काढणी, लाकडी पिंजरा, वाहतूक, हमाली, दलाली मिळून मार्केटला पाठवेपर्यंत प्रचंड खर्च करतो. मार्केटमधील दर स्थिर असला तर खर्च निघतो. मात्र, नैसर्गिक दुष्टचक्राचा फटका पिकाला बसत असल्याने व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. यावर्षी आंबापीक मुळातच कमी आहे. तसेच मार्केटमध्ये अद्याप आंबा मुबलक स्वरूपात जाण्यापूर्वीच कॅनिंग सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)मागणी.. : रात्री अपरात्रीचा आंबा घेऊच नयेकॅनिंग व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. चोरी वाढत असल्यामुळे कलमबागांचे मालक किंवा कराराने बागा घेऊन व्यवसाय करणाऱ्यांकडूनच आंबा कॅनिंग विके्रत्यांनी विकत घ्यावा. चोरीचा किंवा रात्री-अपरात्री आंबा विक्रीस आणणाऱ्यांचा आंबा विकत घेऊ नये, जेणेकरून या चोरीला आळा बसेल. वास्तविक आंबापीक येईपर्यंत प्रचंड खर्च करावा लागत असल्यामुळे या व्यवसायावर कोठेतरी नियंत्रण येणे गरजेचे आहे.-एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी.