शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कोरोना नियंत्रणात आणणे आता गावांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील (जि. सोलापूर) ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या तीन सरपंचांचे विशेष कौतुक केले. यापैकी पोपटराव पवार यांना ३६ वर्षांचा सरपंच पदाचा अनुभव आहे. हिवरेबाजारसारख्या रूक्ष भागाचे त्यांनी नंदनवन केले आहे. त्यामुळे त्यांनी गावाला कोरोनामुक्त ठेवले, हे त्यांच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवातून त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. मात्र, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच्यासारख्या अननुभवी असलेल्या सरपंचांनी कोरोनाचे संकट गावाबाहेर फेकल्याने त्यांचे विशेष कौतुक करायला हवे. म्हणूनच अनेक चांगल्या गोष्टींसाठी विरोध करणाऱ्या गावांनी या सरपंचांचे कार्य लक्षात घ्यावे.

सरपंच हा गावाचा राजा असतो. त्यामुळे आपल्या रयतेचे हित, कल्याण सांभाळणे, ही त्याची जबाबदारी असते. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी त्याने तत्परतेने पुढे यायला हवे. पहिल्या लाटेतील कोरोनाची परिस्थिती हाताळताना कशा तऱ्हेने हाताळायला हवी, हे प्रशासकीय, आरोग्य यंत्रणेलाही माहीत नव्हते. तरीही पहिल्या लाटेत अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्या गाववाल्यांच्या विलगीकरणाची चोख व्यवस्था करीत कोरोनावर मात केली आणि त्याला वेशीबाहेरच टांगला. त्यामुळे अनेक गाव कोरोनामुक्त राहिले. यात ग्राम कृती दलाचे योगदान महत्त्वाचे होते.

मात्र, काेरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ही गावे अयशस्वी का झाली, याचे आत्मपरीक्षण गावांनी करायला हवे. ज्या गावांनी खबरदारी घेतली, त्या गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, ज्या गावांमध्ये बेफिकिरी वाढली, त्या गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्याबाहेर गेली आहे. या लाटेत काही तालुक्यांमध्ये गावेच्या गावे कोरोनाबाधित झाली. यावेळी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची असूनही काही गावांमधील कृती दले उदासीन राहिली. गावांमध्ये येणाऱ्यांसाठी कुठलेच धरबंद राहिले नाहीत. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी घरातील ज्येष्ठ आणि मुलांना बाधित केले. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या लाटेत लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होते. हे रुग्ण घरीच उपचार घेत असताना त्यासोबत घरीच थांबण्याचे पथ्य पाळायचे असते, हेही विसरले. त्यामुळे यांनी अनेकांना प्रसाद दिला. त्यामुळे या दोन महिन्यांतील रुग्णसंख्या गेल्या वर्षभरापेक्षाही दुप्पट झाली.

तसे पाहिले तर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. निदान आता तरी प्रत्येक ग्राम कृती दलाने सतर्क राहायला हवे. ग्रामस्थांसाठी काही निर्बंध घालून देतानाच गावातील रुग्णांच्या अलगीकरण, विलगीकरण या दृष्टीनेही योग्य नियोजन केले तर गाव नक्कीच कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या सरपंचांनी केले ते आपल्याही सरपंचांना शक्य आहे. मात्र, इच्छाशक्ती हवी.