शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
6
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
7
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
8
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
9
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
10
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
11
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
12
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
13
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
14
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
15
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
16
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
17
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
18
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
19
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
20
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

कोरोना नियंत्रणात आणणे आता गावांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील (जि. सोलापूर) ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या तीन सरपंचांचे विशेष कौतुक केले. यापैकी पोपटराव पवार यांना ३६ वर्षांचा सरपंच पदाचा अनुभव आहे. हिवरेबाजारसारख्या रूक्ष भागाचे त्यांनी नंदनवन केले आहे. त्यामुळे त्यांनी गावाला कोरोनामुक्त ठेवले, हे त्यांच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवातून त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. मात्र, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच्यासारख्या अननुभवी असलेल्या सरपंचांनी कोरोनाचे संकट गावाबाहेर फेकल्याने त्यांचे विशेष कौतुक करायला हवे. म्हणूनच अनेक चांगल्या गोष्टींसाठी विरोध करणाऱ्या गावांनी या सरपंचांचे कार्य लक्षात घ्यावे.

सरपंच हा गावाचा राजा असतो. त्यामुळे आपल्या रयतेचे हित, कल्याण सांभाळणे, ही त्याची जबाबदारी असते. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी त्याने तत्परतेने पुढे यायला हवे. पहिल्या लाटेतील कोरोनाची परिस्थिती हाताळताना कशा तऱ्हेने हाताळायला हवी, हे प्रशासकीय, आरोग्य यंत्रणेलाही माहीत नव्हते. तरीही पहिल्या लाटेत अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्या गाववाल्यांच्या विलगीकरणाची चोख व्यवस्था करीत कोरोनावर मात केली आणि त्याला वेशीबाहेरच टांगला. त्यामुळे अनेक गाव कोरोनामुक्त राहिले. यात ग्राम कृती दलाचे योगदान महत्त्वाचे होते.

मात्र, काेरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ही गावे अयशस्वी का झाली, याचे आत्मपरीक्षण गावांनी करायला हवे. ज्या गावांनी खबरदारी घेतली, त्या गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, ज्या गावांमध्ये बेफिकिरी वाढली, त्या गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्याबाहेर गेली आहे. या लाटेत काही तालुक्यांमध्ये गावेच्या गावे कोरोनाबाधित झाली. यावेळी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची असूनही काही गावांमधील कृती दले उदासीन राहिली. गावांमध्ये येणाऱ्यांसाठी कुठलेच धरबंद राहिले नाहीत. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी घरातील ज्येष्ठ आणि मुलांना बाधित केले. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या लाटेत लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होते. हे रुग्ण घरीच उपचार घेत असताना त्यासोबत घरीच थांबण्याचे पथ्य पाळायचे असते, हेही विसरले. त्यामुळे यांनी अनेकांना प्रसाद दिला. त्यामुळे या दोन महिन्यांतील रुग्णसंख्या गेल्या वर्षभरापेक्षाही दुप्पट झाली.

तसे पाहिले तर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. निदान आता तरी प्रत्येक ग्राम कृती दलाने सतर्क राहायला हवे. ग्रामस्थांसाठी काही निर्बंध घालून देतानाच गावातील रुग्णांच्या अलगीकरण, विलगीकरण या दृष्टीनेही योग्य नियोजन केले तर गाव नक्कीच कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या सरपंचांनी केले ते आपल्याही सरपंचांना शक्य आहे. मात्र, इच्छाशक्ती हवी.