शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणात आणणे आता गावांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी ऑनलाईन साधलेल्या संवादावेळी गाव कोरोनामुक्त करणारे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मोहोड तालुक्यातील (जि. सोलापूर) ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या तीन सरपंचांचे विशेष कौतुक केले. यापैकी पोपटराव पवार यांना ३६ वर्षांचा सरपंच पदाचा अनुभव आहे. हिवरेबाजारसारख्या रूक्ष भागाचे त्यांनी नंदनवन केले आहे. त्यामुळे त्यांनी गावाला कोरोनामुक्त ठेवले, हे त्यांच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवातून त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. मात्र, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच्यासारख्या अननुभवी असलेल्या सरपंचांनी कोरोनाचे संकट गावाबाहेर फेकल्याने त्यांचे विशेष कौतुक करायला हवे. म्हणूनच अनेक चांगल्या गोष्टींसाठी विरोध करणाऱ्या गावांनी या सरपंचांचे कार्य लक्षात घ्यावे.

सरपंच हा गावाचा राजा असतो. त्यामुळे आपल्या रयतेचे हित, कल्याण सांभाळणे, ही त्याची जबाबदारी असते. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी त्याने तत्परतेने पुढे यायला हवे. पहिल्या लाटेतील कोरोनाची परिस्थिती हाताळताना कशा तऱ्हेने हाताळायला हवी, हे प्रशासकीय, आरोग्य यंत्रणेलाही माहीत नव्हते. तरीही पहिल्या लाटेत अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्या गाववाल्यांच्या विलगीकरणाची चोख व्यवस्था करीत कोरोनावर मात केली आणि त्याला वेशीबाहेरच टांगला. त्यामुळे अनेक गाव कोरोनामुक्त राहिले. यात ग्राम कृती दलाचे योगदान महत्त्वाचे होते.

मात्र, काेरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ही गावे अयशस्वी का झाली, याचे आत्मपरीक्षण गावांनी करायला हवे. ज्या गावांनी खबरदारी घेतली, त्या गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, ज्या गावांमध्ये बेफिकिरी वाढली, त्या गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्याबाहेर गेली आहे. या लाटेत काही तालुक्यांमध्ये गावेच्या गावे कोरोनाबाधित झाली. यावेळी ग्राम कृती दलाची भूमिका महत्त्वाची असूनही काही गावांमधील कृती दले उदासीन राहिली. गावांमध्ये येणाऱ्यांसाठी कुठलेच धरबंद राहिले नाहीत. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी घरातील ज्येष्ठ आणि मुलांना बाधित केले. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या लाटेत लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होते. हे रुग्ण घरीच उपचार घेत असताना त्यासोबत घरीच थांबण्याचे पथ्य पाळायचे असते, हेही विसरले. त्यामुळे यांनी अनेकांना प्रसाद दिला. त्यामुळे या दोन महिन्यांतील रुग्णसंख्या गेल्या वर्षभरापेक्षाही दुप्पट झाली.

तसे पाहिले तर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. निदान आता तरी प्रत्येक ग्राम कृती दलाने सतर्क राहायला हवे. ग्रामस्थांसाठी काही निर्बंध घालून देतानाच गावातील रुग्णांच्या अलगीकरण, विलगीकरण या दृष्टीनेही योग्य नियोजन केले तर गाव नक्कीच कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या सरपंचांनी केले ते आपल्याही सरपंचांना शक्य आहे. मात्र, इच्छाशक्ती हवी.