शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींची उज्ज्वल कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ ...

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ प्लस" (अधिक हागणदारीमुक्त) म्हणून घोषित झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांनी दिली.

सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्‍यातील सोवेली ग्रापपंचायत, दापोली तालुक्‍यातील देहेण-तुरवडे ग्रातपंचायत, चिखलगाव ग्रामपंचायत, खेड तालुक्‍यातील भिलारेआयनी ग्रामपंचायत, चिपळूण तालुक्‍यातील मोरवणे खुर्द ग्रामपंचायत, गुहागर तालुक्‍यातील काताळवाडी - अंजनवेल ग्रामपंचायत, रत्नागिरी तालुक्‍यातील चक्रदेव- मेर्वी ग्रामपंचायत तसेच संगमेश्‍वर तालुक्‍यातील सागवे ग्रामपंचायत अशा ८ ग्रामपंचायती ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करण्यात आल्या.

राज्य शासनाच्या मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृश्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणची सुविधा (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन, माहिती शिक्षण व संवाद, चित्रमय संदेश या निकषाची पूर्तता करून ग्रामपंचायती ओडीएफ प्लस केल्या गेल्या आहेत. अधिक हागणदारीमुक्त गाव असे त्यांना संबोधले जाते.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या निकषांची उत्स्फूर्तपणे पूर्तता करून स्वच्छता शाश्‍वत ठेवावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ए. बी. मरभळ यांनी केले आहे.