शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींची उज्ज्वल कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ ...

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती १५ ऑगस्ट रोजी "ओडीएफ प्लस" (अधिक हागणदारीमुक्त) म्हणून घोषित झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांनी दिली.

सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्‍यातील सोवेली ग्रापपंचायत, दापोली तालुक्‍यातील देहेण-तुरवडे ग्रातपंचायत, चिखलगाव ग्रामपंचायत, खेड तालुक्‍यातील भिलारेआयनी ग्रामपंचायत, चिपळूण तालुक्‍यातील मोरवणे खुर्द ग्रामपंचायत, गुहागर तालुक्‍यातील काताळवाडी - अंजनवेल ग्रामपंचायत, रत्नागिरी तालुक्‍यातील चक्रदेव- मेर्वी ग्रामपंचायत तसेच संगमेश्‍वर तालुक्‍यातील सागवे ग्रामपंचायत अशा ८ ग्रामपंचायती ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करण्यात आल्या.

राज्य शासनाच्या मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृश्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणची सुविधा (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन, माहिती शिक्षण व संवाद, चित्रमय संदेश या निकषाची पूर्तता करून ग्रामपंचायती ओडीएफ प्लस केल्या गेल्या आहेत. अधिक हागणदारीमुक्त गाव असे त्यांना संबोधले जाते.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या निकषांची उत्स्फूर्तपणे पूर्तता करून स्वच्छता शाश्‍वत ठेवावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ए. बी. मरभळ यांनी केले आहे.