शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीची तक्रार आता मोबाईलवरूनही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई करणार आहे. त्यासाठी ‘लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी’ ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती नूतन पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुशांत चव्हाण यांनी रत्नागिरीत २०१० ते २०१३ या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात काम केले आहे. आता ते बढतीने पुन्हा ते रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. भ्रष्टाचार सर्वत्र असतोच; मात्र समाजाचे काम याेग्य पद्धतीने चालावे यासाठी या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक असते. काही अडचणींमुळे किंवा काही गैरसमजुतीमुळे तक्रारदार पुढे येत नाहीत. जोपर्यंत सहन करणे शक्य आहे तोपर्यंत अनेकदा अशा प्रकारांना खतपाणीच घातलेले दिसून येते. मात्र, जनतेच्या अशाच काही अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही खात्यामार्फत काही संकल्पना राबविणार असल्याचे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे. लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे कार्यालय रत्नागिरीत असल्याने अनेकदा तक्रारदार इथे येणे टाळतात, ही परिस्थिीती लक्षात घेऊन आता ‘लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, लांब राहणाऱ्या तक्रारदाराने आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तर आमचे पथक तिथे जाऊन त्याची तक्रार दाखल करून घेणार आहे. त्याशिवाय याच माध्यमातून तक्रार दिल्यानंतर जबाब, अन्य कागदपत्रे यासाठी होणारी तक्रारदाराची धावपळही कमी होणार आहे. तक्रारदार व्हाॅटस्ॲपद्वारेही तक्रार देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

कामासाठी पैसे मागणे इतक्यापुरताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार मर्यादेत नसून कोणत्याही शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा कोणी अधिकची संपत्ती जमा केली असेल तर त्याच्याविरुद्धही कारवाई करता येते असेही चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांनी विश्वासाने आमच्याशी संपर्क करावा आणि भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले असून, यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर, ०२३५२-२२२८९३ या लँडलाइवर किंवा ९८२३२३३०४४ या मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.