शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीची तक्रार आता मोबाईलवरूनही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई करणार आहे. त्यासाठी ‘लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी’ ही संकल्पना राबविणार असल्याची माहिती नूतन पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुशांत चव्हाण यांनी रत्नागिरीत २०१० ते २०१३ या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात काम केले आहे. आता ते बढतीने पुन्हा ते रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. भ्रष्टाचार सर्वत्र असतोच; मात्र समाजाचे काम याेग्य पद्धतीने चालावे यासाठी या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक असते. काही अडचणींमुळे किंवा काही गैरसमजुतीमुळे तक्रारदार पुढे येत नाहीत. जोपर्यंत सहन करणे शक्य आहे तोपर्यंत अनेकदा अशा प्रकारांना खतपाणीच घातलेले दिसून येते. मात्र, जनतेच्या अशाच काही अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही खात्यामार्फत काही संकल्पना राबविणार असल्याचे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे. लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे कार्यालय रत्नागिरीत असल्याने अनेकदा तक्रारदार इथे येणे टाळतात, ही परिस्थिीती लक्षात घेऊन आता ‘लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, लांब राहणाऱ्या तक्रारदाराने आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तर आमचे पथक तिथे जाऊन त्याची तक्रार दाखल करून घेणार आहे. त्याशिवाय याच माध्यमातून तक्रार दिल्यानंतर जबाब, अन्य कागदपत्रे यासाठी होणारी तक्रारदाराची धावपळही कमी होणार आहे. तक्रारदार व्हाॅटस्ॲपद्वारेही तक्रार देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

कामासाठी पैसे मागणे इतक्यापुरताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार मर्यादेत नसून कोणत्याही शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा कोणी अधिकची संपत्ती जमा केली असेल तर त्याच्याविरुद्धही कारवाई करता येते असेही चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांनी विश्वासाने आमच्याशी संपर्क करावा आणि भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले असून, यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर, ०२३५२-२२२८९३ या लँडलाइवर किंवा ९८२३२३३०४४ या मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.