शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

पर्यटन व्यवसायास ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत ...

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत झाली आहेत. पर्यटकांमुळे हॉटेल्स, लॉजिंग्स व्यवसायही या हंगामात तेजीत असतो. रत्नागिरीत अन्य शहरांच्या तुलनेत महागाई सर्वाधिक असताना पर्यटकांमुळे विविध व्यवसायांना झळाळी असते. उन्हाळी सुट्टीत आलेले पर्यटक, पाहुणे तसेच नागरिकांची सायंकाळच्या वेळेत शहराबरोबर आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी असते. आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये किनाऱ्यांवरही पर्यटकांची उशिरापर्यंत गर्दी असते. मात्र सध्या सर्व किनारे सुने-सुने झाले आहेत. पावसाळ्यातील चार महिने पर्यटन व्यवसाय थंडच असतो. गतवर्षी दीपावलीपासून मंदिरे उघडल्यानंतर पर्यटन व्यवसाय सुरू झाला होता. जेमतेम चार महिने व्यवसाय सुरू होता. मार्चपासून पुन्हा ब्रेक लागला आहे. हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ पार्सल विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी पूर्वीप्रमाणे लोकांचा ओढा कमी झाला आहे. काही व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी सुरू केली आहे. व्यवसाय बुडू नये यासाठी पार्सल सुविधा देण्यात येत असली तरी कोरोनाच्या भीतीमुळे मागणी कमी झाली आहे. विविध खासगी आस्थापनांनी कॉस्टकटिंग सुरू केल्याने कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग - व्यवसाय बुडाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशातून कोरोना हद्दपार होण्यास काही अवधी लागणार आहे. कोरोनाचे पडसाद पर्यटनासह विविध व्यवसायांवर उमटत असल्याने त्यातून सावरायला अजून काही कालावधी जाणार आहे. केवळ सकारात्मक विचार करून चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करणे हाच त्यावर उपाय आहे.