शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
3
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
4
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
5
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
6
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
7
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
8
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
9
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
10
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
11
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
12
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
13
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
14
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
15
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
16
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
17
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
19
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
20
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व्यवसायास ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत ...

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत झाली आहेत. पर्यटकांमुळे हॉटेल्स, लॉजिंग्स व्यवसायही या हंगामात तेजीत असतो. रत्नागिरीत अन्य शहरांच्या तुलनेत महागाई सर्वाधिक असताना पर्यटकांमुळे विविध व्यवसायांना झळाळी असते. उन्हाळी सुट्टीत आलेले पर्यटक, पाहुणे तसेच नागरिकांची सायंकाळच्या वेळेत शहराबरोबर आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी असते. आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये किनाऱ्यांवरही पर्यटकांची उशिरापर्यंत गर्दी असते. मात्र सध्या सर्व किनारे सुने-सुने झाले आहेत. पावसाळ्यातील चार महिने पर्यटन व्यवसाय थंडच असतो. गतवर्षी दीपावलीपासून मंदिरे उघडल्यानंतर पर्यटन व्यवसाय सुरू झाला होता. जेमतेम चार महिने व्यवसाय सुरू होता. मार्चपासून पुन्हा ब्रेक लागला आहे. हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ पार्सल विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी पूर्वीप्रमाणे लोकांचा ओढा कमी झाला आहे. काही व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी सुरू केली आहे. व्यवसाय बुडू नये यासाठी पार्सल सुविधा देण्यात येत असली तरी कोरोनाच्या भीतीमुळे मागणी कमी झाली आहे. विविध खासगी आस्थापनांनी कॉस्टकटिंग सुरू केल्याने कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग - व्यवसाय बुडाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशातून कोरोना हद्दपार होण्यास काही अवधी लागणार आहे. कोरोनाचे पडसाद पर्यटनासह विविध व्यवसायांवर उमटत असल्याने त्यातून सावरायला अजून काही कालावधी जाणार आहे. केवळ सकारात्मक विचार करून चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करणे हाच त्यावर उपाय आहे.