शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पर्यटन व्यवसायास ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत ...

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत झाली आहेत. पर्यटकांमुळे हॉटेल्स, लॉजिंग्स व्यवसायही या हंगामात तेजीत असतो. रत्नागिरीत अन्य शहरांच्या तुलनेत महागाई सर्वाधिक असताना पर्यटकांमुळे विविध व्यवसायांना झळाळी असते. उन्हाळी सुट्टीत आलेले पर्यटक, पाहुणे तसेच नागरिकांची सायंकाळच्या वेळेत शहराबरोबर आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी असते. आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये किनाऱ्यांवरही पर्यटकांची उशिरापर्यंत गर्दी असते. मात्र सध्या सर्व किनारे सुने-सुने झाले आहेत. पावसाळ्यातील चार महिने पर्यटन व्यवसाय थंडच असतो. गतवर्षी दीपावलीपासून मंदिरे उघडल्यानंतर पर्यटन व्यवसाय सुरू झाला होता. जेमतेम चार महिने व्यवसाय सुरू होता. मार्चपासून पुन्हा ब्रेक लागला आहे. हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ पार्सल विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी पूर्वीप्रमाणे लोकांचा ओढा कमी झाला आहे. काही व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी सुरू केली आहे. व्यवसाय बुडू नये यासाठी पार्सल सुविधा देण्यात येत असली तरी कोरोनाच्या भीतीमुळे मागणी कमी झाली आहे. विविध खासगी आस्थापनांनी कॉस्टकटिंग सुरू केल्याने कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग - व्यवसाय बुडाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशातून कोरोना हद्दपार होण्यास काही अवधी लागणार आहे. कोरोनाचे पडसाद पर्यटनासह विविध व्यवसायांवर उमटत असल्याने त्यातून सावरायला अजून काही कालावधी जाणार आहे. केवळ सकारात्मक विचार करून चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करणे हाच त्यावर उपाय आहे.