शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या गतीला वेगनियंत्रकाचा ‘ब्रेक’

By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST

नवा वाहन नियम : प्रती तास ८० किलोमीटर वेग निर्धारित

रत्नागिरी : मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४१ (४)नुसार केंद्र शासनाकडून १ आॅक्टोबर २०१५ वा त्यानंतर उत्पादीत होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून जास्तीतजास्त ८० किलोमीटर प्रती तास वेग निर्धारीत केलेला वेग नियंत्रक बसविंणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, यातून काही वाहने वगळण्यात आली आहेत.केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ११८मध्ये सुधारणा करुन नवीन नियम समाविष्ट करण्यात आला आहे. या नियमानुसार मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४१ (४) नुसार कें द्र शासनाने अधिसूचित केलेल्या आणि १ आॅक्टोबर २०१५ किंवा त्यानंतर उत्पादीत होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून वितरणाच्या वेळेस वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार अकर 018 : 2012 च्या मानकाची पूर्तता करणारा जास्तीतजास्त ८० किलोमीटर प्रती तास वेग निर्धारीत केलेला वेग नियंत्रक बसविंणे आवश्यक आहे. १ आॅक्टोबर २०१५ किंवा त्यानंतर उत्पादीत होणारी वाहने डंपर्स, ट्रक, स्कूल बसेस, धोकादायक मालांची वाहतूक करणारी वाहने किंवा केंद्रशासन राजपत्रातील अधिसूचनेनुसार निर्देशित केलेली इतर कोणत्याही संवर्गातील वाहने यांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा डिलरकडून वितरणाच्या वेळेस वेग नियंत्रक बसविणे आवश्यक आहे. अकर 018 : 2012 च्या मानकास अनुसरुन जास्तीतजास्त ६० किलोमीटर प्रती तास वेग नियंत्रित केलेला असणे आवश्यक आहे. मात्र, यातून काही वाहने वगळण्यात आली आहेत. यात दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, क्वाड्री सायकल, प्रवासी व त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेली चारचाकी वाहने, ज्यांची आसनक्षमता चालकास धरुन ८पेक्षा जास्त नसेल आणि त्याचे एकूण स्थूल वजन ३५ किलोग्रॅमपेक्षा जास्त नसेल अशी वाहने, अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पोलीस विभागाची वाहने, नियम १२६ मध्ये विहित केलेल्या तपासणी संस्थेने सत्यापित व प्रमाणित केलेल्या ज्याचा वेग ८० किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक नाही अशी वाहने यांचा समावेश आहे. यामुळे काही अंशी वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)