शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या सागरात बडे मासे ‘गळा’ला...?

By admin | Updated: April 20, 2016 22:17 IST

लाचलुचपत’ची मोहीम: लाचखोरीची कीड सर्वदूर फोफावली..

 प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच अन्य विभागांतही भ्रष्टाचाराची कीड गेल्या काही वर्षात सर्वदूर फोफावली आहे. समाज पोखरणारी व प्रत्येक कामात सर्वसामान्य जनतेचे आर्थिक लचके तोडणारी ही कीड ठेचण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या चार वर्षांच्या काळात जोमाने पावले उचलली आहेत. त्यामध्ये चिरीमिरी भ्रष्टाचारात गुंतलेल्यांबरोबरच काही बडे मासेही गळाला लागले आहेत. जिल्ह्यातील आणखी काही बडे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी २०१६पासून आतापर्यंत चार कारवाया केल्या असून, त्यातील दोन कारवाया मोठ्या अधिकाऱ्यांवरील आहेत. या काळात प्रथम देवरुखमधील माळवाशी तलाठी संजय जाधव याला जमिनीच्या कागदपत्रांसाठी ५००० रुपये लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. प्रभाकर भावठानकर यांना रुग्णाकडून ५०० रुपये घेताना अटक झाली. पोलीस खात्यातही भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण झाली असून, दाभोळचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग चव्हाण यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. दापोली तालुक्यातील पालगडचे तलाठी संजय गावकर याला २ हजारांची लाच घेताना अटक झाली. २०१६ च्या पहिल्या चार महिन्यात चार जणांवर भ्रष्टाचाराबाबतची कारवाई झाली असून, मोठे अधिकारीही यात गुंतल्याचे पुढे आले आहे. सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा उपलब्ध असतानाही हे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत माहिती देताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले की, जिल्ह्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराबाबत या विभागाकडे अधिक प्रमाणात तक्रारी येत आहेत. अन्य विभागांतही कामांच्या पूर्ततेसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. निनावी पत्रांद्वारेही काही खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती विभागाला मिळाली आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरोधात केलेल्या कारवाईचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी पहिल्या साडेतीन महिन्यातच लाचखोरांवर चार प्रकरणात कारवाया झाल्या आहेत. २०१४ सालात १२ प्रकरणांमध्ये लाचखोरांवर कारवाई झाली. २०१५ सालातही १२ कारवाया झाल्या व एका प्रकरणाचा तपास झाला. काही तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, अन्य लोकसेवक भ्रष्टाचारात गुंतल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे लाचखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. सतीशकुमार गुरव : महसूल विभागाच्याच सर्वाधिक तक्रारी.... गेल्या दोन वर्षात लाचखोरांवरील कारवाईसाठी विभागाचे कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात फिरत आहेत. भ्रष्टाचाराची कुजबूज असलेल्या सरकारी कार्यालयात वेशांतर करूनही भ्रष्टाचाराने त्रस्त लोकांना भेटून लाच मागणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले जात असल्याचे उपअधीक्षक गुरव म्हणाले. व्यापक कारवाई... रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सध्या उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक व १० पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. या कर्मचारी संख्येचा सुयोग्य वापर करीत या वर्षभरात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाई व्यापक केली जाणार आहे.