शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

भ्रष्टाचाराच्या सागरात बडे मासे ‘गळा’ला...?

By admin | Updated: April 20, 2016 22:17 IST

लाचलुचपत’ची मोहीम: लाचखोरीची कीड सर्वदूर फोफावली..

 प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच अन्य विभागांतही भ्रष्टाचाराची कीड गेल्या काही वर्षात सर्वदूर फोफावली आहे. समाज पोखरणारी व प्रत्येक कामात सर्वसामान्य जनतेचे आर्थिक लचके तोडणारी ही कीड ठेचण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या चार वर्षांच्या काळात जोमाने पावले उचलली आहेत. त्यामध्ये चिरीमिरी भ्रष्टाचारात गुंतलेल्यांबरोबरच काही बडे मासेही गळाला लागले आहेत. जिल्ह्यातील आणखी काही बडे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी २०१६पासून आतापर्यंत चार कारवाया केल्या असून, त्यातील दोन कारवाया मोठ्या अधिकाऱ्यांवरील आहेत. या काळात प्रथम देवरुखमधील माळवाशी तलाठी संजय जाधव याला जमिनीच्या कागदपत्रांसाठी ५००० रुपये लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. प्रभाकर भावठानकर यांना रुग्णाकडून ५०० रुपये घेताना अटक झाली. पोलीस खात्यातही भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण झाली असून, दाभोळचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग चव्हाण यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. दापोली तालुक्यातील पालगडचे तलाठी संजय गावकर याला २ हजारांची लाच घेताना अटक झाली. २०१६ च्या पहिल्या चार महिन्यात चार जणांवर भ्रष्टाचाराबाबतची कारवाई झाली असून, मोठे अधिकारीही यात गुंतल्याचे पुढे आले आहे. सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा उपलब्ध असतानाही हे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत माहिती देताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले की, जिल्ह्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराबाबत या विभागाकडे अधिक प्रमाणात तक्रारी येत आहेत. अन्य विभागांतही कामांच्या पूर्ततेसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. निनावी पत्रांद्वारेही काही खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती विभागाला मिळाली आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरोधात केलेल्या कारवाईचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी पहिल्या साडेतीन महिन्यातच लाचखोरांवर चार प्रकरणात कारवाया झाल्या आहेत. २०१४ सालात १२ प्रकरणांमध्ये लाचखोरांवर कारवाई झाली. २०१५ सालातही १२ कारवाया झाल्या व एका प्रकरणाचा तपास झाला. काही तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, अन्य लोकसेवक भ्रष्टाचारात गुंतल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे लाचखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. सतीशकुमार गुरव : महसूल विभागाच्याच सर्वाधिक तक्रारी.... गेल्या दोन वर्षात लाचखोरांवरील कारवाईसाठी विभागाचे कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात फिरत आहेत. भ्रष्टाचाराची कुजबूज असलेल्या सरकारी कार्यालयात वेशांतर करूनही भ्रष्टाचाराने त्रस्त लोकांना भेटून लाच मागणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले जात असल्याचे उपअधीक्षक गुरव म्हणाले. व्यापक कारवाई... रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सध्या उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक व १० पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. या कर्मचारी संख्येचा सुयोग्य वापर करीत या वर्षभरात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाई व्यापक केली जाणार आहे.