शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

खतांच्या विक्रीवर भरारी पथकाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यासाठी युरियाचा एकूण ८,००० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील ...

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यासाठी युरियाचा एकूण ८,००० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खत विक्री करू नये, यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत नजर ठेवली जात आहे.

कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकरी तत्काळ रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकतात किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात युरिया खताची मोठी मागणी आहे. कृषी सेवा केंद्रात जर जास्त दराने खत विक्री करत असतील, तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत. मात्र, त्यासाठी लेखी तक्रार येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सर्व खत विक्री केंद्रे, ग्रामीण सोसायट्यांपर्यंत खत पुरवठा सुरू झालेला आहे. त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना खताची विक्री सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत ८,००० मेट्रिक टन इतका खतसाठा उपलब्ध झाल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके गुणवत्ता भावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पथकप्रमुख जिल्हा परिषद कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्या नेतृत्वाखाली खत विक्री सेवा केंद्र व कृषी विषयक सेवा केंद्रांना भेटी देऊन तेथील तपासणी केली जात आहे. खतविक्रीबाबत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.