शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावध, ऐका पुढल्या हाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

कोरोना रुग्णसंख्या घटू लागलीय, त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले बहुतांशी निर्बंध आता हळूहळू उठविण्यात आले आहेत. मात्र, सर्व व्यावसायिक, ...

कोरोना रुग्णसंख्या घटू लागलीय, त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले बहुतांशी निर्बंध आता हळूहळू उठविण्यात आले आहेत. मात्र, सर्व व्यावसायिक, नागरिकांना निर्बंध उठल्याने मोकळे वाटत असले तरीही गेल्या वर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात ठेवायला हवा. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आरोग्य क्षेत्रालाही नवीन होते. त्यामुळे याविषयी काय निर्णय घ्यायला हवा, याबाबत शासन आणि प्रशासनही गोंधळलेले होते. त्यामुळे ज्या ज्या वेळी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर निर्बंध उठले, त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली आणि त्याचबरोबर मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली होती, हा अनुभव विसरता कामा नये.

गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबईहून गावी परतलेल्या चाकरमान्यांमुळे रुग्णसंख्या वाढली. ती नियंत्रणात आणताना आरोग्य विभागाची दमछाक झाली. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी गणेशोत्सवात अधिकच निर्बंध उठविण्यात आले. त्यामुळे जिल्हाबंदी उठली आणि सात पाच महिने बंद असलेली रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहने सुरू झाली. साहजिकच पुन्हा गणपती सणासाठी मुंबईकर गावात दाखल झाले. येताना कोरोनाची भेटही घेऊन आले. त्यामुळे पुन्हा कोेरोनाचा विस्फोट झाला. गत वर्षी सप्टेंबर महिना हा कोरोना विस्फोट ठरला.

गत वर्षीची पुनरावृत्ती यावर्षीही होत आहे. मार्च महिन्यात शिमग्यात आलेल्या मुंबईकरांनी येताना कोरोना सोबत आणला. त्याचा संसर्ग एवढा वाढला की, वर्षभरात साडेदहा हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, गेल्या ५ महिन्यांत ६२ हजारांपेक्षाही अधिक रुग्ण या काळात नाेंदविले गेले आणि जवळपास १७०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता आणखी काही दिवसांत गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि त्याच्या आराेग्य विभागाला जेरीला आणल्यानंतर आता कुठे रुग्णसंख्या आटोक्यात येतेय, ती पुन्हा वाढण्याचा धोका समोर आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होतेय, याचा अर्थ असा नव्हे की, कोरोना कायमचा संपणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेची पुनरावृत्ती टाळून जर दुसरी लाट संपली, तर तिसऱ्या लाटेला थोपविणे शक्य होईल. पहिल्या लाटेवेळी तिचे परिणाम फारसे कुणालाच माहीत नव्हते. मात्र, योग्य खबरदारी घेतली, तर आपण स्वत: सुरक्षित राहू आणि आपल्या संपर्कात येणारे आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी यांनाही आपण सुरक्षित ठेवू. म्हणूनच निर्बंध उठविले गेले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असे नव्हे. गाफीलपणा पुन्हा तिसऱ्या लाटेच्या संकटात टाकेल. आद्यकवी केशवसुत यांच्या ‘तुतारी’ या प्रसिद्ध कवितेतील सावध, ऐका पुढल्या हाका, या पंक्तींप्रमाणे निर्बंध उठले म्हणून गणेशोत्सवासह अन्य येणाऱ्या सणांवेळी योग्य खबरदारी घेतली नाही, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविताना आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचीही दमछाक होईल.