शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही दिवशी संप पूर्णत: यशस्वी झाल्याचा बँक कर्मचाऱ्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

रत्नागिरी : सरकारच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बँक कर्मचारी ब अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा ...

रत्नागिरी : सरकारच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बँक कर्मचारी ब अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी केला आहे. कोरोनाच्या फैलावामुळे संघटनांची निदर्शने कुठेच झाली नाहीत, परंतु महाराष्ट्रातून बहुसंख्य शहरांतून संपाची भूमिका स्पष्ट करणारी पत्रके संपकरी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वाटली.

विद्यमान सरकारने दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँकिंग उद्योगातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेने दि. १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. देशभरातील जवळपास १० लाख बँक अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. मात्र, शनिवार - रविवार सुटी आणि दोन दिवस संप असे सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने उद्योग व्यवसायांवर त्याचा परिणाम झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

देशातील बँकिंगपैकी जवळपास ७० टक्के व्यवसाय हा सरकारी बँकांमधून हाताळला जातो. नव्वद लाख कोटींच्या आसपास ठेवी व साठ लाख कोटींची कर्जे असा एकूण १५० लाख कोटींचा व्यवसाय सार्वजनिक बँकांतून हाताळला जातोय. खासगीकरणाच्या माध्यमातून व धोरणातून हा व्यवसाय मूठभर काॅर्पोरेट्सना खूश करण्यासाठी त्यांच्या हाती सोपविणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला ब बँकिंग उद्योगाला परवडणारे नाही.

१९६९ ला बँकांचे राष्ट्रीयीकरण करताना ठेवलेली उद्दिष्ट्ये अजूनही पूर्ण झालेली नाहीत. अजूनही बँकांच्या शाखा विस्ताराची ग्रामीण भागात गरज आहे. शेती, शेतमजूर व खेडोपाडी विखुरलेला छोटा-मोठा व्यावसायिक यांना बँकेच्या सुविधांची व आपल्या विकासासाठी कर्जांची गरज आहे. सरकारी बँका खासगी उद्योजक व उद्योग समूह यांच्या हाती गेल्या तर हाच वर्ग बँक खासगीकरणामुळे या बँकिंगच्या सर्व सेवांपासून वंचित राहील. खासगी मालक म्हणजेच उद्योजक स्वतःच्या व्यवसायासाठी व उद्योगांसाठी कर्जरूपाने वापरण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची बचत सुरक्षित राहणार नाही. म्हणून ‘बँक बचाओ - देश बचाओ’ ही घोषणा घेऊन बँक कर्मचारी यांनी दोन दिवसांचा संप केला.

या संपामध्ये अधिकारी वर्गाच्या चार संघटना व कर्मचारी वर्गाच्या पाच संघटना अशा एकूण नऊ संघटना व बँकिग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण देशातील व राज्यातीलही बँकिंग उद्योग ठप्प झाले. सरकारने आपल्या बँक खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करावा व ते रद्द करावे, अन्यथा या संपानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा संघटना प्रतिनिधींनी दिला.