शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दोन्ही दिवशी संप पूर्णत: यशस्वी झाल्याचा बँक कर्मचाऱ्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

रत्नागिरी : सरकारच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बँक कर्मचारी ब अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा ...

रत्नागिरी : सरकारच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बँक कर्मचारी ब अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी केला आहे. कोरोनाच्या फैलावामुळे संघटनांची निदर्शने कुठेच झाली नाहीत, परंतु महाराष्ट्रातून बहुसंख्य शहरांतून संपाची भूमिका स्पष्ट करणारी पत्रके संपकरी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वाटली.

विद्यमान सरकारने दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँकिंग उद्योगातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेने दि. १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. देशभरातील जवळपास १० लाख बँक अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. मात्र, शनिवार - रविवार सुटी आणि दोन दिवस संप असे सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने उद्योग व्यवसायांवर त्याचा परिणाम झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

देशातील बँकिंगपैकी जवळपास ७० टक्के व्यवसाय हा सरकारी बँकांमधून हाताळला जातो. नव्वद लाख कोटींच्या आसपास ठेवी व साठ लाख कोटींची कर्जे असा एकूण १५० लाख कोटींचा व्यवसाय सार्वजनिक बँकांतून हाताळला जातोय. खासगीकरणाच्या माध्यमातून व धोरणातून हा व्यवसाय मूठभर काॅर्पोरेट्सना खूश करण्यासाठी त्यांच्या हाती सोपविणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला ब बँकिंग उद्योगाला परवडणारे नाही.

१९६९ ला बँकांचे राष्ट्रीयीकरण करताना ठेवलेली उद्दिष्ट्ये अजूनही पूर्ण झालेली नाहीत. अजूनही बँकांच्या शाखा विस्ताराची ग्रामीण भागात गरज आहे. शेती, शेतमजूर व खेडोपाडी विखुरलेला छोटा-मोठा व्यावसायिक यांना बँकेच्या सुविधांची व आपल्या विकासासाठी कर्जांची गरज आहे. सरकारी बँका खासगी उद्योजक व उद्योग समूह यांच्या हाती गेल्या तर हाच वर्ग बँक खासगीकरणामुळे या बँकिंगच्या सर्व सेवांपासून वंचित राहील. खासगी मालक म्हणजेच उद्योजक स्वतःच्या व्यवसायासाठी व उद्योगांसाठी कर्जरूपाने वापरण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची बचत सुरक्षित राहणार नाही. म्हणून ‘बँक बचाओ - देश बचाओ’ ही घोषणा घेऊन बँक कर्मचारी यांनी दोन दिवसांचा संप केला.

या संपामध्ये अधिकारी वर्गाच्या चार संघटना व कर्मचारी वर्गाच्या पाच संघटना अशा एकूण नऊ संघटना व बँकिग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण देशातील व राज्यातीलही बँकिंग उद्योग ठप्प झाले. सरकारने आपल्या बँक खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करावा व ते रद्द करावे, अन्यथा या संपानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा संघटना प्रतिनिधींनी दिला.