शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निकृष्ट कल्टार

By admin | Updated: July 22, 2015 23:57 IST

कृषी विभाग : २८ लाखांच्या दर्जाहीन कल्टारची विक्री !

रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुमारे २८ लाखांचे ५०० लीटर्सपेक्षा अधिक कल्टार विकले गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कमी दर्जा असलेल्या या कल्टारच्या वापरामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. दरम्यान, जिल्हा कृषी विभागाने विक्रेत्यांकडे असलेल्या सिंजेटा कंपनीच्या नुकसानकारक कल्टार विक्रीवर बंदी घातली आहे, तर कमी दर्जाचे कल्टार विकताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे व कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिला आहे. जिल्ह्यात आंबा हे मुख्य पीक आहे. जवळपास ६८ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. आंब्याला लवकर मोहोर व आंबे येण्यासाठी शेतकरी विविध कंपन्यांची कल्टार (पीक संवर्धन संजीवके) वापरतात. त्यामध्ये काही कंपन्या या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना थेट विक्री करीत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरु आहेत. या विके्रत्यांकडून शेतकऱ्यांना कल्टार खरेदीचे बिल दिले जात नाही. हे कल्टार अत्यंत कमी दर्जाचे असल्यामुळे कमी किमतीत शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होणारच आहे. शिवाय बागेचे नुकसान होऊन उत्पन्नातही मोठी घट होणार आहे. हापूस आंब्याच्या कलमांवरही त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हे कल्टार खासगी विक्रेत्यांकडून न घेता अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे. तसेच संबंधित विक्रेत्यांकडून पक्क्या बिलाची मागणी शेतकऱ्यांनी करावी. दिलेले बिलही जपून ठेवावे, जेणेकरुन भविष्यात काही तक्रार आल्यास संबंधित विक्रेत्याविरुध्द कृषी विभागाला कारवाई करणे सोयीस्कर होईल, असेही उपाध्यक्ष शेवडे यांनी सांगितले. सध्या बाजारामध्ये कलस्टार, बोलस्टार आणि सेलस्टार अशा विविध नावांनी ही कल्टार उपलब्ध आहेत. ही कमी दर्जाची कल्टार कोणी अनधिकृतरित्या विकत असतील अथवा अशा अनधिकृत विक्रेत्यांबद्दल शेतकऱ्यांना काही माहिती मिळाल्यास तसेच त्याबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी (दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२३०६८) यांच्याशी संपर्क साधावा व भविष्यात होणारे आपले मोठे नुकसान टाळावे, असे आवाहन उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)कमी दर्जाच्या आणि भविष्यात आंबा बागांना नुकसानकारक ठरणाऱ्या एका कंपनीच्या कल्टारची विक्री करताना रत्नागिरी शहरातील काही विके्रते आढळून आले. या विक्रेत्यांकडे असलेल्या या कंपनीच्या ५३० लीटर्सच्या कल्टार विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात आली.- पी. एन. देशमुख कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.आंबा बागायतदारांंनी कल्टारची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी. खरेदीचे बिल घेऊन ते जपून ठेवण्याची कृषी विभागाची सूचना. निकृष्ट दर्जाचे कल्टार विक्रेत्यांबाबत तक्रार आल्यास जिल्हा परिषद कृषी विभागाकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा. गावोगाव विनाबिल निकृष्ट कल्टार विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे प्रमाण वाढल्याने हापूस आंबा पीक धोक्यात येणार असल्याची शक्यता.