शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साडेदहा हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी १३ हजार २७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत १० हजार ७२८ मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यात आले असल्याने यावर्षी शेतकऱ्यांची गैरसोय झालेली नाही.

जून, जुलैमध्ये जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल राहतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वेळीच खत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले होते. जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला होता. खत साठ्याच्या मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर युरिया, सुफला इतर संयुक्त खतांचाही साठा शासनाकडून उपलब्ध झाला होता. टप्प्याटप्प्याने दहा हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.

आतापर्यंत युरिया खत ७,२२७ मेट्रिक टन व सुफला, १९:१९:१९, १८:१८:१० इतर संयुक्त खते ३,५१९ मेट्रिक टन उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना वेळेअगोदरच साडेचार हजार मेट्रिक टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे.

जिल्ह्यातील २३६ खत विकी केंद्र व विविध सहकारी सोसायट्यांकडे खत वितरीत झाले आहे. लवकरच उर्वरित खतसाठाही उपलब्ध होणार आहे. कृषी विभागातर्फे जिल्हा, तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी आतापर्यंत एकही शेतकऱ्यांकडून खत उपलब्धतेबाबत तक्रार आलेली नाही. हा कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

मान्सूनपूर्व पावसावर पेरण्या आटोपल्याने पोषक हवामानामुळे रोपांची वाढ जोमदार झाली असल्याने जिल्ह्यात भात लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. खताची उपलब्धता वेळेवर झाल्याने लागवडीच्या कामामध्ये व्यत्यय आला नसल्याने शेतकरी समाधानी आहेत.

--------------------

जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित खतसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे. तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप एकही तक्रार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.

- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.