शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

जिल्ह्यात साडेदहा हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी १३ हजार २७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत १० हजार ७२८ मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यात आले असल्याने यावर्षी शेतकऱ्यांची गैरसोय झालेली नाही.

जून, जुलैमध्ये जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल राहतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वेळीच खत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले होते. जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला होता. खत साठ्याच्या मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर युरिया, सुफला इतर संयुक्त खतांचाही साठा शासनाकडून उपलब्ध झाला होता. टप्प्याटप्प्याने दहा हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.

आतापर्यंत युरिया खत ७,२२७ मेट्रिक टन व सुफला, १९:१९:१९, १८:१८:१० इतर संयुक्त खते ३,५१९ मेट्रिक टन उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना वेळेअगोदरच साडेचार हजार मेट्रिक टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे.

जिल्ह्यातील २३६ खत विकी केंद्र व विविध सहकारी सोसायट्यांकडे खत वितरीत झाले आहे. लवकरच उर्वरित खतसाठाही उपलब्ध होणार आहे. कृषी विभागातर्फे जिल्हा, तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी आतापर्यंत एकही शेतकऱ्यांकडून खत उपलब्धतेबाबत तक्रार आलेली नाही. हा कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

मान्सूनपूर्व पावसावर पेरण्या आटोपल्याने पोषक हवामानामुळे रोपांची वाढ जोमदार झाली असल्याने जिल्ह्यात भात लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. खताची उपलब्धता वेळेवर झाल्याने लागवडीच्या कामामध्ये व्यत्यय आला नसल्याने शेतकरी समाधानी आहेत.

--------------------

जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित खतसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे. तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप एकही तक्रार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.

- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.