शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

जिल्ह्यात साडेदहा हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यासाठी १३ हजार २७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत १० हजार ७२८ मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यात आले असल्याने यावर्षी शेतकऱ्यांची गैरसोय झालेली नाही.

जून, जुलैमध्ये जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल राहतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वेळीच खत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले होते. जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला होता. खत साठ्याच्या मागणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर युरिया, सुफला इतर संयुक्त खतांचाही साठा शासनाकडून उपलब्ध झाला होता. टप्प्याटप्प्याने दहा हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.

आतापर्यंत युरिया खत ७,२२७ मेट्रिक टन व सुफला, १९:१९:१९, १८:१८:१० इतर संयुक्त खते ३,५१९ मेट्रिक टन उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना वेळेअगोदरच साडेचार हजार मेट्रिक टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे.

जिल्ह्यातील २३६ खत विकी केंद्र व विविध सहकारी सोसायट्यांकडे खत वितरीत झाले आहे. लवकरच उर्वरित खतसाठाही उपलब्ध होणार आहे. कृषी विभागातर्फे जिल्हा, तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याठिकाणी आतापर्यंत एकही शेतकऱ्यांकडून खत उपलब्धतेबाबत तक्रार आलेली नाही. हा कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

मान्सूनपूर्व पावसावर पेरण्या आटोपल्याने पोषक हवामानामुळे रोपांची वाढ जोमदार झाली असल्याने जिल्ह्यात भात लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. खताची उपलब्धता वेळेवर झाल्याने लागवडीच्या कामामध्ये व्यत्यय आला नसल्याने शेतकरी समाधानी आहेत.

--------------------

जिल्ह्यासाठी १३,२७० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार ७२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित खतसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे. तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप एकही तक्रार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.

- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.