शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

तृतीयपंथी यांच्या मदतीला ‘आस्था’ धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

रत्नागिरी : समाजाने ज्यांना उपेक्षित ठरविले अशा तृतीयपंथींची कोरोना काळात उपासमार होत असतानाच येथील आस्था सोशल फाउंडेशन त्यांच्या मदतीला ...

रत्नागिरी : समाजाने ज्यांना उपेक्षित ठरविले अशा तृतीयपंथींची कोरोना काळात उपासमार होत असतानाच येथील आस्था सोशल फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून गेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकी १००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू या व्यक्तींना देण्यात आल्या.

आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी ही संस्था मागील बारा वर्षे दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील आस्थाचे कार्य चालूच आहे. दिव्यांगांप्रमाणेच समाजातील अत्यंत दुर्लक्षित व वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी, दुर्दैवाने कोरोनाच्या आव्हानात्मक काळात देखील शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या वर्गाला झाली नाही. सन्मानाने जगण्याची इच्छा असूनही कोणीही काम देत नाही, बँका कर्ज देत नाही, राहण्यासाठी हक्काचे घर नाही, समाजाकडून तुच्छ वागणूक मिळते, त्यामुळे नाइलाजाने “मंगती” करून लाचारीचे जगणे जगावे लगत आहे. महिला धोरणात, शासन निर्णयात तृतीयपंथी यांच्या कल्याणाबाबत शासनाकडून सूचना असून देखील प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत काहीच पोहचत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांचे नेतृत्व करणारी पल्लवी शर्मिला माने यांना आस्थाच्या प्रयत्नाने जिल्हास्तरीय दिव्यांग सुलभ निवडणूक सनियंत्रण समितीवर घेण्यात आले. सर्वांचे ओळखपत्र तयार करून त्यात तृतीयपंथी (Third Gender) अशी ओळख अद्ययावत करण्यात आली आणि इथूनच त्यांचा हक्क मिळविण्याचा प्रवास सुरू झाला आहे.

कोरोना काळात रेल्वे, आठवडा बाजार, बाजारपेठ बंद असल्यामुळे अतिशय बिकट परिस्थितीत असलेल्या या तृतीयपंथींना आस्थाच्या माध्यमातून गुरुवारी प्रधान टी यांच्याकडून किराणा सामानाचे किट व देणगीदार कृपाली बिडये यांच्याकडून प्रत्येकी १००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू पल्लवी माने, महेश्वरी लोहार, अक्षय शेट्ये, प्रमोद तांबे यांना देण्यात आल्या.

यावेळी आस्थाच्या सुरेखा पाथरे, संकेत चाळके, कल्पेश साखरकर, संपदा कांबळे तसेच प्रधान टीच्या वतीने खतिजा प्रधान, श्रुती बागवे आदी उपस्थित होते.