शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

तृतीयपंथी यांच्या मदतीला ‘आस्था’ धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

रत्नागिरी : समाजाने ज्यांना उपेक्षित ठरविले अशा तृतीयपंथींची कोरोना काळात उपासमार होत असतानाच येथील आस्था सोशल फाउंडेशन त्यांच्या मदतीला ...

रत्नागिरी : समाजाने ज्यांना उपेक्षित ठरविले अशा तृतीयपंथींची कोरोना काळात उपासमार होत असतानाच येथील आस्था सोशल फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून गेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकी १००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू या व्यक्तींना देण्यात आल्या.

आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी ही संस्था मागील बारा वर्षे दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील आस्थाचे कार्य चालूच आहे. दिव्यांगांप्रमाणेच समाजातील अत्यंत दुर्लक्षित व वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी, दुर्दैवाने कोरोनाच्या आव्हानात्मक काळात देखील शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या वर्गाला झाली नाही. सन्मानाने जगण्याची इच्छा असूनही कोणीही काम देत नाही, बँका कर्ज देत नाही, राहण्यासाठी हक्काचे घर नाही, समाजाकडून तुच्छ वागणूक मिळते, त्यामुळे नाइलाजाने “मंगती” करून लाचारीचे जगणे जगावे लगत आहे. महिला धोरणात, शासन निर्णयात तृतीयपंथी यांच्या कल्याणाबाबत शासनाकडून सूचना असून देखील प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत काहीच पोहचत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांचे नेतृत्व करणारी पल्लवी शर्मिला माने यांना आस्थाच्या प्रयत्नाने जिल्हास्तरीय दिव्यांग सुलभ निवडणूक सनियंत्रण समितीवर घेण्यात आले. सर्वांचे ओळखपत्र तयार करून त्यात तृतीयपंथी (Third Gender) अशी ओळख अद्ययावत करण्यात आली आणि इथूनच त्यांचा हक्क मिळविण्याचा प्रवास सुरू झाला आहे.

कोरोना काळात रेल्वे, आठवडा बाजार, बाजारपेठ बंद असल्यामुळे अतिशय बिकट परिस्थितीत असलेल्या या तृतीयपंथींना आस्थाच्या माध्यमातून गुरुवारी प्रधान टी यांच्याकडून किराणा सामानाचे किट व देणगीदार कृपाली बिडये यांच्याकडून प्रत्येकी १००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू पल्लवी माने, महेश्वरी लोहार, अक्षय शेट्ये, प्रमोद तांबे यांना देण्यात आल्या.

यावेळी आस्थाच्या सुरेखा पाथरे, संकेत चाळके, कल्पेश साखरकर, संपदा कांबळे तसेच प्रधान टीच्या वतीने खतिजा प्रधान, श्रुती बागवे आदी उपस्थित होते.