शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

रेल्वे प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का? : शाैकत मुकादम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने ...

चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने या गाड्यांमधून प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का, असा प्रश्न कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा शासनाचा निर्णय योग्य असला तरी कोकण रेल्वेच्या मार्गावर दररोज जाणाऱ्या व येणाऱ्या २० रेल्वे गाड्या धावत आहेत. यामध्ये मंगला, नेत्रावती, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. जिल्हा व तालुका या ठिकाणी यांच्यातील काही गाड्या थांबत असून, रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी प्रवासी उतरत आहेत. रेल्वेस्थानकावर असणारी कॅन्टीन, फेरीवाले व कर्मचारी यांच्याशी प्रवाशांचा संपर्क होतो. जिल्ह्यामधून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या लॉकडाऊन असेपर्यंत बंद करण्यात याव्यात, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे. परजिल्ह्यांतील लोकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांशी संपर्क आला, तर लाॅकडाऊनचा काय उपयोग, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे़