शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

रेल्वे प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का? : शाैकत मुकादम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने ...

चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने या गाड्यांमधून प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का, असा प्रश्न कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा शासनाचा निर्णय योग्य असला तरी कोकण रेल्वेच्या मार्गावर दररोज जाणाऱ्या व येणाऱ्या २० रेल्वे गाड्या धावत आहेत. यामध्ये मंगला, नेत्रावती, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. जिल्हा व तालुका या ठिकाणी यांच्यातील काही गाड्या थांबत असून, रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी प्रवासी उतरत आहेत. रेल्वेस्थानकावर असणारी कॅन्टीन, फेरीवाले व कर्मचारी यांच्याशी प्रवाशांचा संपर्क होतो. जिल्ह्यामधून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या लॉकडाऊन असेपर्यंत बंद करण्यात याव्यात, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे. परजिल्ह्यांतील लोकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांशी संपर्क आला, तर लाॅकडाऊनचा काय उपयोग, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे़