शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आंगवली - रेवाळेवाडीत विहीर काेसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली - रेवाळेवाडी येथे जवाहर ग्राम समृद्धी याेजनेतून बांधण्यात आलेली विहीर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली - रेवाळेवाडी येथे जवाहर ग्राम समृद्धी याेजनेतून बांधण्यात आलेली विहीर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे काेसळली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, दाेन दिवस सुटी आल्याने या घटनेचा पंचनामा हाेऊ शकलेला नाही.

तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडीतील प्रताप गोविंद रेवाळे यांच्या घरानजीक सन २००६-०७ मध्ये ही विहीर बांधण्यात आली हाेती. या विहिरीचे पाणी परिसरातील पाच ते सहा कुटुंबे पिण्यासाठी वापरतात. या विहिरीची उंची अंदाजे २५ फूट इतकी आहे. शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही विहीर पूर्णतः कोसळली गेली आहे. काळ्या दगडाचे बांधकाम असलेली ही विहीर ढासळल्याने बुजली आहे. यामुळे आता येथील कुटुंबांच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. विहीर काेसळल्याने सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुटीमुळे दाेन दिवस पंचनामा हाेऊ शकलेला नाही.

040921\58191854-img-20210904-wa0040.jpg

आंगवली रेवाळवाडी येथील ढासळलेली विहीर