शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी ७५३ ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी ७५३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. आतापर्यंत २५१ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २३८ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित १३ लाभार्थ्यांची नुकसानभरपाईची रक्कम मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात मुख्यत्वे भात पिकाचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. पावसावर अवलंबून भात शेती असून, जिल्ह्याची भाताची उत्पादकता चांगली आहे. भाताच्या उत्पादकतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर विमा परतावा देण्यात येतो. मात्र, उत्पादकता चांगली असल्याने गेल्या दोन वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना विमा परतावा प्राप्त झाला नव्हता. मात्र, गेले दोन वर्षे काढणी पश्चात भात शेतीच्या पावसामुळे व पुरामुळे नुकसान होत असल्याने काढणी पश्चातील नुकसानीचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. यावर्षी काढणी पश्चात २३० शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना १४ लाख २७ हजार ७०० रुपयांचा परतावा प्राप्त झाला आहे. महसूल मंडलातील १३ लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगानंतर परतावा दिला जाणार आहे. त्याचे वितरण रखडले आहे.

७० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन

भात पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर पीक विमा परतावा दिला जातो. मात्र, कोकणात ७० टक्क्यांपेक्षा उंबरठा उत्पादन आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा योजनेंतर्गत लाभ मिळाला नव्हता. २०१९ मध्ये पुरामुळे नुकसान झाल्याने सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती.

उत्पादकता चांगली

जिल्ह्यातील ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्याची भाताची उत्पादकता २४.७३ क्विंटल आहे. उत्पादकता जिल्ह्याची चांगली आहे; परंतु भात पीक काढणीनंतर अवेळीच्या पावसामुळे होत असलेले नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना परतावा देण्यात येत आहे. यावर्षी २३८ शेतकऱ्यांना काढणी पश्चात झालेल्या नुकसानीबद्दल परतावा प्राप्त झाला आहे. पीक कापणी प्रयोग महसूल मंडलांतर्गत राबविण्यात येतो. प्रत्येक महसूल मंडळात हा प्रयोग राबविल्यानंतर उत्पादकता निश्चित केली जाते. कमी उत्पादकता असणाऱ्या मंडलातील शेतकऱ्यांना परतावा दिला जाणार आहे.

भाताचे उत्पादन घेत असताना कापलेले पीक शेतावर भिजून होत असलेले नुकसान आता ग्राह्य धरू लागल्याने विमा परताव्याची रक्कम प्राप्त झाली आहे. प्रथमच यावर्षी परतावा प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास बळावला आहे. नक्कीच भविष्यात विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल.

- रवींद्र शेलार, शेतकरी

पावसावर भात पिकाचे उत्पादन अवलंबून असले तरी आतापर्यंत विमा परताव्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. सरसकट उंबरठा उत्पादनावर परताव्यासाठी निकष लावण्यात येत होते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर परतावा दिला जातो त्यामुळे आतापर्यंत शेतकरी वंचित होते.

- अनिता गुरव, शेतकरी

गेल्या दहा वर्षांतील सरासरी उत्पादनानंतर सलग तीन वर्षांपेक्षा कमी उत्पादनावर उंबरठा उत्पादन ठरविण्यात येते. जिल्ह्याचे उंबरठा उत्पादन चांगले आहे. त्यामुळे उत्पादनाचा निकष परताव्यासाठी लावला जात होता. मात्र, आता निकष बदलेले आहेत. कोकणसाठी निकष वेगळे लावणे गरजेचे आहे.

- संतोष रामाणी, शेतकरी