शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

आबलोली गावात दारुबंदीसाठी सर्व महिला एकवटल्या

By admin | Updated: January 30, 2015 23:15 IST

ग्रामसभेतील निर्णय : केवळ ठराव नाही तर अंमलबजावणी

असगोली : आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच प्रमोद गोणबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मराठी शाळा येथे उत्साहात झाली. यावेळी सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. त्यानंतर सविता विठ्ठल पागडे यांनी सर्वांचे लक्ष वेधत दारुबंदी झालीच पाहिजे, तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊन फॅशन म्हणून दारु पित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. तरुणपिढी बरबाद होऊ नये, म्हणूनच आबलोली गावात दारुबंदी झालीच पाहिजे असा ठराव मांडताच सर्व महिला एकवटल्या व दारुबंदीचा ठराव संमत केला गेला. या ठरावाला मिनल कदम, सुप्रिया साळवी यांनी अनुमोदन दिले व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.दारुबंदीसाठी आबलोली गावातर्फे महिलांची जाहीर सभा घेण्यात येणार असून पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्यासाठी पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे. यावेळी सरपंच प्रमोद गोणबरे, उपसरपंच प्रमेय आर्यमाने, सदस्य विजय वैद्य, नरेश निमूणकर, सदस्या मोहिनी पांचाळ, मानसी पागडे, अस्मिता रेपाळ, रसिका कदम, विनिता बाईत, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, ग्रामसेवक नाईक, पोलीसपाटील महेश भाटकर, उल्हास काळे, सुभाष काजरोळकर, महेंद्र कदम, सचिन बाईत, सचिव कारेकर यांच्यासह या ग्रामसभेला १२२ ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिला उपस्थित होत्या. या निर्णयामुळे तालुक्यातील अन्य गावातील महिलांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)