शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सर्वपक्षीय एकमत गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

७४० किलाेमीटर लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी या प्रत्येकी १०० किलाेमीटर ...

७४० किलाेमीटर लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी या प्रत्येकी १०० किलाेमीटर लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशामधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन ॲण्ड टुब्रो, गॅमन इंडिया या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक खूप रखडले. कोकण रेल्वे मार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्ष ३ महिन्यांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या. जवळपास ४७ हजार कुटुंब विस्थापित झाली. असे असले तरी अनेक अडचणींवर मात करत कोकणची भाग्यरेखा कोकण रेल्वे आता सुरु आहे. सन १९९० ते ९८ या कालावधीत हा रेल्वे मार्ग पूर्ण करताना निर्माण झालेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन एकेरी मार्ग बनवला. पण आज केंद्र सरकारने ठरवले आणि कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी ठाम निर्णय घेतला तर हाच रेल्वे मार्ग दुहेरी करता येईल. आज जी कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती आहे, त्यापेक्षा दहापटीने हा दुहेरी मार्ग मिळवून देईल. शिवाय वाशिष्ठी नदीचे पाणी परशुरामच्या टेकडीवर लिफ्ट करून नवीन रेल्वे मार्गाच्या बाजूने दक्षिणेकडे गोव्यापर्यंत व उत्तरेकडे ठाण्यापर्यंत सायपल पद्धतीने नेता येईल.

कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहणारे नेते आज जरी हयात नसतील तरीसुद्धा सध्याच्या नेत्यांनी एकत्रित येऊन यावर विचार केला तर हा दुहेरी मार्ग आणि सायपल पद्धतीने पाणी पुरवठ्याची योजना अद्ययावत तंत्रज्ञानाने अवघ्या ३ ते ४ वर्षांत पूर्ण होईल . जेणेकरून कोकणात रोजगार निर्मिती होऊन सुजलाम् सुफलाम् कोकण पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र सर्वपक्षीय नेत्यांचे या विषयावर एकमत होणे गरजेचे आहे.

- डॉ. गजानन पाटील