शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

गणेशाेत्सव काळात ग्राम कृती दलावर सारा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST

अडरे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाकाळ आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने पूर्ण दक्षता ...

अडरे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाकाळ आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने पूर्ण दक्षता घेत तयारी केली आहे. त्यासाठी प्रत्येक तपासणी नाका, एस. टी. बसस्थानक, रेल्वे स्थानक याठिकाणी आरोग्य व प्रशासकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच स्थानिक पातळीवर ग्राम कृती दल कार्यरत करण्यात आली असून, त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

यावर्षी निर्बंधांत काही प्रमाणात अधिक शिथिलता असल्याने चाकरमान्यांची संख्या वाढणार आहे. गणेशाेत्सवाआधी सुमारे चार ते पाच दिवस चाकरमान्यांचे आगमन सुरू होते. त्यानुसार शनिवारपासून कोकणात चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. त्यासाठी प्रशासनही पूर्णतः सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. काेकणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी नाक्यावर माहिती घेतली जाणार आहे. त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, गावातील नातेवाईकांचे मोबाईल नंबर, संबंधित ग्रामपंचायत, त्याचबरोबर लसीकरण, कोरोना चाचणी अहवाल ही सर्व माहिती येथे घेतली जाणार आहे. ही माहिती त्याचदिवशी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठवली जाणार असून, तेथून थेट तालुकास्तरावर आरोग्य विभाग तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली जाणार आहे. तेथून पुढे स्थानिक पातळीवर ग्राम कृती दलाकडे ही माहिती दिली जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्याला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करून कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्यास विलगीकरण व कोरोनाबाधित असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, ही सर्व जबाबदारी ग्राम कृती दलाकडे राहणार आहे. तसेच गावात येणाऱ्या चाकरमान्यांची नोंददेखील ग्राम कृती दलाकडे राहणार आहे. तपासणी नाका तसेच एस. टी. बसस्थानक व रेल्वे स्थानक येथे आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, प्राथमिक चाचणी व आवश्यक वाटल्यास अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन ते थेट स्थानिक ग्रामस्थ अशी साखळी निर्माण करून चाकरमानी, प्रवाशांची काळजी घेतानाच गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा व कोरोनाला रोखण्यात यश मिळावे, या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

------------------------

चार ठिकाणी तपासणी नाके

रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कशेडी, कुंभार्ली, मुर्शी आणि खारेपाटण अशी चार प्रवेशद्वार आहेत. या चारही ठिकाणी तपासणी नाकी तयार करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे पेंडॉल उभारण्यात आले आहेत. येथे आरोग्य, महसूल आणि पोलीस अशी पथके तैनात करण्यात आली आहेत.