शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

समुद्रकिनाऱ्यावरील गावांना ‘अलर्ट’

By admin | Updated: July 13, 2014 00:28 IST

पावसाचा पुन्हा जोर : दापोलीत पाजपंढरीतील घरांना पुन्हा धोका

दापोली/जैतापूर : गेले चार दिवस वादळी वाऱ्यासह सतत कोसळणाऱ्या पावसाने समुद्रकिनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या हर्णै पाजपंढरी येथील घरांना समुद्र खवळल्याने धोका निर्माण झाला असून, संपूर्ण जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना अलर्ट देण्यात आला आहे. आज, शनिवारी सकाळी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा एकदा जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळेही किनारपट्टी भागांचा धोका वाढला आहे. केवळ मच्छिमारच नाही, तर हजारो सर्वसामान्य कुटुंबेही समुद्रकिनारपट्टीवर राहतात. यापूर्वी या कुटुंबांना समुद्रातील वादळ-वाऱ्याचा फारसा फटका बसत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत होत असलेल्या सागरी अतिक्रमणामुळे, त्सुनामी- सारख्या प्रलयांमुळे समुद्रकिनारपट्टीवरील कुटुंबे अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे पाजपंढरी, मुरुड, कर्दे येथील सुमारे २३५ कुटुंबांना महसूल विभागाने स्थलांतराचे आदेश दिले होते. मात्र, पाऊस नसल्याने ही कुटुंबे स्थलांतरित झाली नव्हती; परंतु गेले चार दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टींची परिस्थिती निर्माण झाल्याने धोकादायक असणाऱ्या कुटुंबांना सावध राहण्याचा व कोणत्याही दुर्घटनेची तत्काळ खबर देण्याच्या सूचना महसूल यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. राजापूर, रत्नागिरी व गुहागर या तीन तालुक्यांतही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)