शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

समुद्रकिनाऱ्यावरील गावांना ‘अलर्ट’

By admin | Updated: July 13, 2014 00:28 IST

पावसाचा पुन्हा जोर : दापोलीत पाजपंढरीतील घरांना पुन्हा धोका

दापोली/जैतापूर : गेले चार दिवस वादळी वाऱ्यासह सतत कोसळणाऱ्या पावसाने समुद्रकिनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या हर्णै पाजपंढरी येथील घरांना समुद्र खवळल्याने धोका निर्माण झाला असून, संपूर्ण जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना अलर्ट देण्यात आला आहे. आज, शनिवारी सकाळी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा एकदा जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळेही किनारपट्टी भागांचा धोका वाढला आहे. केवळ मच्छिमारच नाही, तर हजारो सर्वसामान्य कुटुंबेही समुद्रकिनारपट्टीवर राहतात. यापूर्वी या कुटुंबांना समुद्रातील वादळ-वाऱ्याचा फारसा फटका बसत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत होत असलेल्या सागरी अतिक्रमणामुळे, त्सुनामी- सारख्या प्रलयांमुळे समुद्रकिनारपट्टीवरील कुटुंबे अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे पाजपंढरी, मुरुड, कर्दे येथील सुमारे २३५ कुटुंबांना महसूल विभागाने स्थलांतराचे आदेश दिले होते. मात्र, पाऊस नसल्याने ही कुटुंबे स्थलांतरित झाली नव्हती; परंतु गेले चार दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टींची परिस्थिती निर्माण झाल्याने धोकादायक असणाऱ्या कुटुंबांना सावध राहण्याचा व कोणत्याही दुर्घटनेची तत्काळ खबर देण्याच्या सूचना महसूल यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. राजापूर, रत्नागिरी व गुहागर या तीन तालुक्यांतही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)