शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनाऱ्यावरील गावांना ‘अलर्ट’

By admin | Updated: July 13, 2014 00:28 IST

पावसाचा पुन्हा जोर : दापोलीत पाजपंढरीतील घरांना पुन्हा धोका

दापोली/जैतापूर : गेले चार दिवस वादळी वाऱ्यासह सतत कोसळणाऱ्या पावसाने समुद्रकिनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या हर्णै पाजपंढरी येथील घरांना समुद्र खवळल्याने धोका निर्माण झाला असून, संपूर्ण जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना अलर्ट देण्यात आला आहे. आज, शनिवारी सकाळी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा एकदा जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळेही किनारपट्टी भागांचा धोका वाढला आहे. केवळ मच्छिमारच नाही, तर हजारो सर्वसामान्य कुटुंबेही समुद्रकिनारपट्टीवर राहतात. यापूर्वी या कुटुंबांना समुद्रातील वादळ-वाऱ्याचा फारसा फटका बसत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत होत असलेल्या सागरी अतिक्रमणामुळे, त्सुनामी- सारख्या प्रलयांमुळे समुद्रकिनारपट्टीवरील कुटुंबे अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे पाजपंढरी, मुरुड, कर्दे येथील सुमारे २३५ कुटुंबांना महसूल विभागाने स्थलांतराचे आदेश दिले होते. मात्र, पाऊस नसल्याने ही कुटुंबे स्थलांतरित झाली नव्हती; परंतु गेले चार दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टींची परिस्थिती निर्माण झाल्याने धोकादायक असणाऱ्या कुटुंबांना सावध राहण्याचा व कोणत्याही दुर्घटनेची तत्काळ खबर देण्याच्या सूचना महसूल यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. राजापूर, रत्नागिरी व गुहागर या तीन तालुक्यांतही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)