शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

समुद्रकिनाऱ्यावरील गावांना ‘अलर्ट’

By admin | Updated: July 13, 2014 00:28 IST

पावसाचा पुन्हा जोर : दापोलीत पाजपंढरीतील घरांना पुन्हा धोका

दापोली/जैतापूर : गेले चार दिवस वादळी वाऱ्यासह सतत कोसळणाऱ्या पावसाने समुद्रकिनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या हर्णै पाजपंढरी येथील घरांना समुद्र खवळल्याने धोका निर्माण झाला असून, संपूर्ण जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गावांना अलर्ट देण्यात आला आहे. आज, शनिवारी सकाळी थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा एकदा जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळेही किनारपट्टी भागांचा धोका वाढला आहे. केवळ मच्छिमारच नाही, तर हजारो सर्वसामान्य कुटुंबेही समुद्रकिनारपट्टीवर राहतात. यापूर्वी या कुटुंबांना समुद्रातील वादळ-वाऱ्याचा फारसा फटका बसत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत होत असलेल्या सागरी अतिक्रमणामुळे, त्सुनामी- सारख्या प्रलयांमुळे समुद्रकिनारपट्टीवरील कुटुंबे अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे पाजपंढरी, मुरुड, कर्दे येथील सुमारे २३५ कुटुंबांना महसूल विभागाने स्थलांतराचे आदेश दिले होते. मात्र, पाऊस नसल्याने ही कुटुंबे स्थलांतरित झाली नव्हती; परंतु गेले चार दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टींची परिस्थिती निर्माण झाल्याने धोकादायक असणाऱ्या कुटुंबांना सावध राहण्याचा व कोणत्याही दुर्घटनेची तत्काळ खबर देण्याच्या सूचना महसूल यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. राजापूर, रत्नागिरी व गुहागर या तीन तालुक्यांतही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)