शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

ऐन श्रावणात सणासुदीचा गाेडवा कमी झाला; साखर महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले चार महिने साखरेचे दर बऱ्यापैकी स्थिर होते. ३४ रुपये किलो दराने ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले चार महिने साखरेचे दर बऱ्यापैकी स्थिर होते. ३४ रुपये किलो दराने साखर विक्री सुरू होती. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक साखरेचे दर कडाडले असून ३८ रुपये किलाे दराने साखर विक्री सुरू आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. त्यातच किलोमागे चार रुपयांनी दरवाढ केल्याने ग्राहकांना मात्र चांगलाच भुर्दंड बसला आहे.

श्रावणापासून गणेशोत्सवापर्यत सणासुदीच्या काळात घरोघरी पदार्थांची रेलचेल सुरू असते. गोड पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात; परंतु साखरच महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाऊक बाजारातच दर वाढले असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील माॅल्समधील विक्रीदरातही वाढ झाली आहे. दरवाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट मात्र कोलमडले असून नाराजी व्यक्त होत आहे.

गुळाला मागणी

आयुर्वेदामध्ये गुळाचे महत्त्व विशद केले आहे. मधुमेहाच्या भीतीमुळे साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर केला जातो. ४५ ते ५० रुपये किलो दराने गूळ विक्री सुरू आहे. साखरेपेक्षा गुळाचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे गुळाचा वापरही मर्यादितच आहे.

दरवाढीवर निर्बंध असावेत

खाद्यतेलापाठोपाठ आता साखरेचे दरात वाढ करण्यात आली आहे. किलोमागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. श्रावणापासून सण सुरू होतात. त्यामुळे दैनंदिन वापरापेक्षा सणासुदीच्या काळात खप अधिक होत असतानाच दरवाढ करण्यात आली आहे.

- रोहिणी पाध्ये, गृहिणी

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करण्यापूर्वी किंवा महागाईचा दर निश्चित करताना, सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करणे गरजेचे आहे शिवाय दरवाढीवर शासनाचे निर्बंध असणे आवश्यक आहेत. मात्र, तसे होत नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. यामुळे महिन्याचे बजेट वाढले आहे.

- प्राजक्ता चाळके, गृहिणी

दरवाढीचे कारण गुलदस्त्यातच

जिल्ह्यात साखरेची आवक नवी मुंबई, कोल्हापूर येथून होत आहे. पूर व दरडी कोसळल्यामुळे पर्यायी मार्गाने अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. अंतर वाढल्याने इंधन व वाहतूक खर्चात वाढ झाली असल्याने दरवाढ झाली असावी, मात्र प्रत्यक्ष कारण मात्र समजू शकले नाही.

- अमित शेट्ये, व्यापारी

गेल्या आठवड्यात साखरेचे भाव बऱ्यापैकी स्थिर होते. मात्र, आठवड्याशेवटी अचानक दरवाढ जाहीर करण्यात आली. घाऊक मार्केटमध्ये दर वाढल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. किलोमागे तब्बल चार रुपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीचे कारण मात्र सांगण्यात आलेले नाही.

- आसिफ मेमन, व्यापारी