शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

स्वच्छतेसाठी अजेंडा हाती

By admin | Updated: February 20, 2015 23:15 IST

चंद्रकांत कदम : खेड तालुका निर्मल करण्यासाठी प्रयत्न

खेड : जिल्हाभरातील अनेक ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. मात्र, ही आकडेवारी समाधानकारक नाही. जिल्हाभरात अद्याप ८८ ग्रामपंचायती शौचालयाविना आहेत. खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत. आता निर्मल ग्राम योजनेची काटेकोर अंमलबजावणी करून खेड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींना शौचालये उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सभापती चंद्रकांत कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.खेड तालुका निर्मलग्राम करणार असून, ते आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. उघड्यावर शौचाय बसणे हे कोणत्याही रोगराईस आमंत्रण देण्यासारखे आहे. याबाबत अनेकांनी अनेक ठिकाणी जनजागृतीही केली. मात्र, याविषयी किती लोक जागरूक झाले, हा संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने निर्मल ग्राम योजना अमलात आणली. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी सरकारने या योजनेस मूर्त स्वरूप दिले. साधारणपणे ६ ते ७ वर्षांपूर्वी ही स्थिती गंभीर होती. आज यामध्ये काही प्रमाणात बदल झाला. गावे निर्मल झाली असली तरीही याचे प्रमाण समाधानकारक नाही. अनेक गावपुढाऱ्यांनी सरकारी योजनांचा अनावश्यक लाभ घेतला आहे. तरीही वैयक्तीक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जिल्ह्यातील २० टक्के कुटुंब आजही शौचालयाविना आहेत. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायती आजही शौचालयाविना आहेत, तर ३ लाख ६४ हजार ९८० कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत. शौचालयाविना असलेली दारिद्र्यरेखेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांची यादीही हजारोंच्या घरात आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपये अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०२२पर्यंत निर्मल भारत अभियानअंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सभापती कदम यांनी सांगितले.सर्व पंचायत समित्यांनी शौचालयांकरिता प्रस्ताव मागवले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक असल्याचा सूर आळवला जात आहे. खेडमध्ये ही परिस्थिती गंभीर नाही. मात्र, १८ ग्रामंपचायतींकडे आर्थिक परिस्थितीअभावी आजही शौचालये नाहीत. याकरिता त्यांना शौचालये बांधून देण्याच्या कामी सभापती चंद्रकांत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. इतर ग्रामपंचायतींसमवेत मागे असलेल्या ग्रामपंचायतींनाही सोबत घेऊन जाणार असून, निर्मल ग्राम योजनेत त्यांनाही स्थान देणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. (प्रतिनिधी)