शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘मासेमारी बंद’नंतर आता लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:45 IST

बंदरे, मच्छीमारी शांत : ज्येष्ठ, आषाढातच लागतात विवाहाचे वेध

जैतापूर : पावसाच्या आगमनाने आणि शासनाच्या बंदी आदेशामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली...नौका किनाऱ्यावर स्थिरावल्या...आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसह राजापूर तालुक्यातील बंदरेही काही काळासाठी शांत झाली आहेत. तुळसुंदेसह जिल्ह््यातील अन्य खारवी समाजाची वस्ती असलेल्या गावातून सध्या लगीनघाई सुरू झाली आहे.राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या जिल्ह्यातील मोठ्या बंदरासह तुळसुंदे, दांडे-अणसुरे, सागवे, कातळी, नाणार या प्रमुख बंदरांसह खाडीअंतर्गत लहान-लहान गावातून लहान मोठ्या यांत्रिक, बिगर यांत्रिक होड्या, लाँचेस, पर्ससीन नेट आदींद्वारे मासेमारी व्यवसाय चालतो. नारळी पोर्णिमा ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खाडीसह खोल समुद्रात चालणाऱ्या या व्यवसायामुळे बंदरांच्या गावांबरोबरच आजूबाजूच्या गावांमधील बाजारपेठाही गजबजलेल्या दिसतात. मात्र, बंदीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मात्र किनारपट्टीलगतच्या अनेक गावांतून मात्र मंदी जाणवते.राजापूर तालुक्यातील एकमेव खारवी समाजाचे गाव असलेल्या तुळसुंदे गावात मात्र मासेमारी बंदी काळात मोठी धावपळ, गडबड असते. त्याला कारणही तसेच आहे. अनेक बंदरांतून या काळात शांतता असताना तुळसुंदे गावात मात्र लगीनघाईची गडबड दिसून येते. काही वर्षांपूर्वी तुळसुंदेदेखील नावाजलेले मच्छीमारी केंद्र होते. मोठ्या प्रमाणावर गावात सधन समाजाची वस्ती होती. गावात प्रत्येक सण मोठ्या धामधुमीत साजरा होत असे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्टचक्रात अडकलेला मच्छीमार बांधव पुन्हा सावरू शकलेला नाही. अन्यत्र ऐन चैत्र -वैशाखात लगीनसराई असताना कामानिमित्त बाहेर असलेल्या खारवी समाजात मात्र ज्येष्ठ - आषाढात लगीनसराई असते. समुद्रात बोटींवर कामाला असणाऱ्या खलाशांबरोबरच मुंबई-पुणेसारख्या शहरात असलेला खारवी समाजबांधव पावसाळयातील या महिन्यात गावी येतो. मुसळधार पडणाऱ्या वरूणराजाच्या साक्षीने नवपरिणित वर-वधूंवर अक्षता पडतात. आता खारवी समाज बांधवांमध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. (वार्ताहर)पावसाळयातील दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत गावात म्हामदा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यावर्षी तुळसुंदे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचीही गडबड असल्याने जोरदार शक्ती प्रदर्शनासाठी राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्ये तळीरामांची मात्र चांगलीच चंगळ होणार आहे.