शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

पतीच्या निधनानंतर शेतीने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील शीळ येथील सुप्रिया सुभाष सावंत यांनी पतीच्या निधनानंतरही बारमाही शेती करीत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील शीळ येथील सुप्रिया सुभाष सावंत यांनी पतीच्या निधनानंतरही बारमाही शेती करीत असून, शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घरालगतच एक एकर क्षेत्रावर पावसाळी भात, हळद व त्यानंतर भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत आहे. योग्य नियोजन व कठोर परिश्रमातून उत्पन्न मिळवित आहेत. सुप्रिया यांना तीनही मुलांचे शेतीच्या कामासाठी सहकार्य मिळत आहे.

घरालगतच शेती असल्यामुळे शेतीकडे लक्ष देणे सोपे होत आहे. एक एकर क्षेत्रावर भात व हळद लागवड केली आहे. पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करून हळदीसाठी वापरत आहेत. दरवर्षी ४० ते ५० किलो हळद पावडर तयार करून विक्री करीत असून, उत्पन्न मिळवित आहेत. पाच गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करीत आहेत.

पाच गुंठ्यामध्ये हळदीची कंद लावल्यानंतर कंदाच्या मधल्या जागेत पालेभाज्यांची लागवड केली. कंदाची वाढ होईपर्यंत पालेभाजीचे उत्पन्न प्राप्त झाले. आंतरपिकामुळे आर्थिक फायदा तर झाला, शिवाय तणनियंत्रण झाल्याने खर्च वाचला. आंतरपिकातून उत्पन्नाचा मार्गही सापडला आहे.

भाजीपाला उत्पादन

भात काढल्यानंतर रब्बी हंगामात मुळा, माठ या पालेभाज्यांसह काही क्षेत्रावर भेंडी, वांगी, दोडका, पडवळ लागवडीतून उत्पादन घेण्यात येत आहे. भात काढणीनंतर सरी पद्धतीने पालेभाज्यांची लागवड केली जात आहे. भाजी विक्रीसाठी त्यांना फारशी अडचण येत नाही. भाजीपाल्यातून चांगला फायदा होतो, असेही सावंत यांनी सांगितले.

सेंद्रिय खताचा वापर

आंबा, काजूची झाडे असून, आंबा, काजू विक्रीतूनही उत्पन्न प्राप्त होत आहे. बागायतीपेक्षा भाजीपाला पिकावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. शेण, पालापाचोळा यापासून तयार केलेले सेंद्रिय खत पिकांसाठी वापर करीत आहेत. ज्यामुळे पिकांचे उत्पन्न व दर्जा उत्कृष्ट राखण्यास मदत होतो. रासायनिक खतांचा नाममात्र आहे.

बारमाही शेती

कृषी कार्यालयाकडून सावंत यांना मार्गदर्शन लाभत आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु रब्बी व उन्हाळी शेतीसाठी घरालगत असलेल्या विहिरीतून पाणी देणे शक्य होत आहे. पाणी मुबलक असल्याने त्यांना बारमाही शेती शक्य होत आहे. शेतीतून उत्पन्नाचा मार्ग सावंत यांनी शोधला असून, त्यामध्ये यश प्राप्त झाले आहे.

चार प्रकारच्या भात वाणाची लागवड

कृषी विभागाने सावंत यांना रत्नागिरी ४, सहा व २४ आदी विद्यापीठ प्रमाणित भाताचे वाण दिले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात या वाणांची लागवड केली आहे, शिवाय उर्वरित क्षेत्रावर त्यांना पारंपरिक गावठी वाणाची लागवड केली आहे. कोणत्या क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या भाताचे उत्पन्न मिळाले हे भात काढणीनंतरच समजणार आहे, जेणेकरून अन्य शेतकऱ्यांना बियाणे लागवडीबाबत माहिती प्राप्त होईल व बियाणे लागवडीकडे कल वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे उपलब्ध करून देता येणार असल्याचे सुप्रिया सावंत यांनी सांगितले.