शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या निधनानंतर शेतीने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील शीळ येथील सुप्रिया सुभाष सावंत यांनी पतीच्या निधनानंतरही बारमाही शेती करीत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील शीळ येथील सुप्रिया सुभाष सावंत यांनी पतीच्या निधनानंतरही बारमाही शेती करीत असून, शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घरालगतच एक एकर क्षेत्रावर पावसाळी भात, हळद व त्यानंतर भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत आहे. योग्य नियोजन व कठोर परिश्रमातून उत्पन्न मिळवित आहेत. सुप्रिया यांना तीनही मुलांचे शेतीच्या कामासाठी सहकार्य मिळत आहे.

घरालगतच शेती असल्यामुळे शेतीकडे लक्ष देणे सोपे होत आहे. एक एकर क्षेत्रावर भात व हळद लागवड केली आहे. पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करून हळदीसाठी वापरत आहेत. दरवर्षी ४० ते ५० किलो हळद पावडर तयार करून विक्री करीत असून, उत्पन्न मिळवित आहेत. पाच गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करीत आहेत.

पाच गुंठ्यामध्ये हळदीची कंद लावल्यानंतर कंदाच्या मधल्या जागेत पालेभाज्यांची लागवड केली. कंदाची वाढ होईपर्यंत पालेभाजीचे उत्पन्न प्राप्त झाले. आंतरपिकामुळे आर्थिक फायदा तर झाला, शिवाय तणनियंत्रण झाल्याने खर्च वाचला. आंतरपिकातून उत्पन्नाचा मार्गही सापडला आहे.

भाजीपाला उत्पादन

भात काढल्यानंतर रब्बी हंगामात मुळा, माठ या पालेभाज्यांसह काही क्षेत्रावर भेंडी, वांगी, दोडका, पडवळ लागवडीतून उत्पादन घेण्यात येत आहे. भात काढणीनंतर सरी पद्धतीने पालेभाज्यांची लागवड केली जात आहे. भाजी विक्रीसाठी त्यांना फारशी अडचण येत नाही. भाजीपाल्यातून चांगला फायदा होतो, असेही सावंत यांनी सांगितले.

सेंद्रिय खताचा वापर

आंबा, काजूची झाडे असून, आंबा, काजू विक्रीतूनही उत्पन्न प्राप्त होत आहे. बागायतीपेक्षा भाजीपाला पिकावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. शेण, पालापाचोळा यापासून तयार केलेले सेंद्रिय खत पिकांसाठी वापर करीत आहेत. ज्यामुळे पिकांचे उत्पन्न व दर्जा उत्कृष्ट राखण्यास मदत होतो. रासायनिक खतांचा नाममात्र आहे.

बारमाही शेती

कृषी कार्यालयाकडून सावंत यांना मार्गदर्शन लाभत आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु रब्बी व उन्हाळी शेतीसाठी घरालगत असलेल्या विहिरीतून पाणी देणे शक्य होत आहे. पाणी मुबलक असल्याने त्यांना बारमाही शेती शक्य होत आहे. शेतीतून उत्पन्नाचा मार्ग सावंत यांनी शोधला असून, त्यामध्ये यश प्राप्त झाले आहे.

चार प्रकारच्या भात वाणाची लागवड

कृषी विभागाने सावंत यांना रत्नागिरी ४, सहा व २४ आदी विद्यापीठ प्रमाणित भाताचे वाण दिले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात या वाणांची लागवड केली आहे, शिवाय उर्वरित क्षेत्रावर त्यांना पारंपरिक गावठी वाणाची लागवड केली आहे. कोणत्या क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या भाताचे उत्पन्न मिळाले हे भात काढणीनंतरच समजणार आहे, जेणेकरून अन्य शेतकऱ्यांना बियाणे लागवडीबाबत माहिती प्राप्त होईल व बियाणे लागवडीकडे कल वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे उपलब्ध करून देता येणार असल्याचे सुप्रिया सावंत यांनी सांगितले.